नामा म्हणे आता लोपला दिनकर l बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ... (featured) जलसंवाद विशेषांक - लेख आपण सारेच अगदी नकळत्या वयापासून रामायण-महाभारतातील कथा ऐकत असतो. या कथांत मौजीबंधन झाले, की गुरूगृही म्हणजे ऋषींच्या आश्रमांत जाऊन शिक्षा ग्रहण करण्याची प्रथा होती. तथापि सर्वसाधारणपणे सारेच ही एक भूतकाळातील गोष्ट आहे म्हणून त्याकडे बघतात. परंतु माझ्या मनाला मात्र नेहमीच या शिक्षण पद्धतीचा, त्या प्रकारच्या गुरूंचा ध्यास लागलेला असे. आपल्यालाही असे ऋषी, गुरु म्हणून लाभावे आणि त्यांच्याकडून विद्या ग्रहण करण्याची संधी मिळावी असे मनापासून वाटे. एक मन सांगे, हे कलीयुग आहे, या युगात असे गुरु लाभणे अतिशय दुरापास्त. तथापि दुसरे मन या गोष्टीचा ध्यास सोडायला तयार नव्हते. आणि चमत्कारच झाला जणू! सर्वसाधारणपणे गुरूंकडे जाऊन अभ्यास केला जातो. परंतु विरोधाभास असा, की मला अभ्यास ध्यासातून गुरु प्राप्ती झाली. कलियुगात ऋषीतुल्य गुरु लाभले. अर्थातच हे ऋषीतुल्य गुरु म्हणजे आंतरराष्ट्रीय क...