दळणं (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
पाव-विश्व (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) अवघ्या विश्वात 'शेती प्रधान देश' अशी आपल्या भारताची ओळख आहे. किनारपट्टीच्या भागात भात अतिशय मुबलक प्रमाणात पिकत असल्याने, त्या भागातील भात हे मुख्य अन्न. तथापि उर्वरित भारतात सर्वत्र पोळी, भाकरीचे विविध प्रकार, हा मुख्य अन्नाचा भाग असतो. यात पोळीचे प्रकार म्हटले तर, फुलका, घडीची पोळी, पुरणपोळी, शेंगापोळी, गुळपोळी, फुटण्याची पोळी, खव्याची पोळी, खोबऱ्याची पोळी, गुलाबजामची पोळी, पेढ्याची पोळी, गोड दशमी, सांज्याची पोळी; पराठ्याचे प्रकार म्हणजे मेथी-पालक या सारख्या पालेभाज्यांचे पराठे, लाछा/केरला पराठा, तिखटमिठाचे पराठे, सारण भरून करायचे पराठे म्हणजे बटाट्याचे, पनीरचे, कांद्याचे, कोबीचे अशी न संपणारी यादी आहे. भाकारीचेही तसेच ज्वारीची, बाजरीची, मेथीची, तांदुळाची, बेसनाची, नाचणीची असे बरेच प्रकार आहेत. तथापि आपल्या भारत देशाच्या बाहेर पडले की आपली गाठ पडते ती, पाव...