दळणं (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
जलसंवाद विशेषांक - लेख (featured) नामा म्हणे आता लोपला दिनकर l बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ... आपण सारेच अगदी नकळत्या वयापासून रामायण-महाभारतातील कथा ऐकत असतो. या कथांत मौजीबंधन झाले, की गुरूगृही म्हणजे ऋषींच्या आश्रमांत जाऊन शिक्षा ग्रहण करण्याची प्रथा होती. तथापि सर्वसाधारणपणे सारेच ही एक भूतकाळातील गोष्ट आहे म्हणून त्याकडे बघतात. परंतु माझ्या मनाला मात्र नेहमीच या शिक्षण पद्धतीचा, त्या प्रकारच्या गुरूंचा ध्यास लागलेला असे. आपल्यालाही असे ऋषी, गुरु म्हणून लाभावे आणि त्यांच्याकडून विद्या ग्रहण करण्याची संधी मिळावी असे मनापासून वाटे. एक मन सांगे, हे कलीयुग आहे, या युगात असे गुरु लाभणे अतिशय दुरापास्त. तथापि दुसरे मन या गोष्टीचा ध्यास सोडायला तयार नव्हते. आणि चमत्कारच झाला जणू! सर्वसाधारणपणे गुरूंकडे जाऊन अभ्यास केला जातो. परंतु विरोधाभास असा, की मला अभ्यास ध्यासातून गुरु प्राप्ती झाली. कलियुगात ऋषीतुल्य गुरु लाभले. अर्थातच हे ऋषीतुल्य गुरु म्हणजे आंतरराष्ट्रीय ...