Skip to main content

Posts

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...
Recent posts

🔯🕉️🔯 रांगोळी नायिका - ३ 🔯🕉️ (व्यक्ती विशेष)

  🔯🕉️🔯  रांगोळी नायिका - ३ 🔯🕉️ (व्यक्ती विशेष) भावाचे रंग रेखुनी, दारात काढू सात्विक रांगोळी I  लक्ष्मी देवीची कृपा व्हावी, हीच मंगल कामना निराळी II  बाप्पा मोरया                     आधीच्या भागात म्हटल्या प्रमाणे भूअलंकरण म्हणजेच रांगोळी हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि मनोवेधक लक्षण आहे. एक खास, विशेष अशी भारतीय कला आहे. या कलेच असंख्य उल्लेख, अनेक प्राचीन भारतीय साहित्यात आलेले आहेत. वात्सायन(३-४ शतकात रचले गेले आहे) ह्या ग्रंथात ६४ कलांची यादी दिलेली आहे, या कलांच्या यादीत भूअलंकरण म्हणजेच रांगोळी या कलेचा समावेश केलेला आहे.                        पहिली रांगोळी, याबद्दल एक लोककथा सांगितली जाते, ब्रह्मदेवाने एकदा आंब्याच्या झाडाचा रस काढून, जमिनीवर एका सुंदर स्त्रीची प्रतिमा काढली. ही सुंदर स्त्री म्हणजे उर्वशी. हीच प्रतिमा पहिली रांगोळी किंवा भूअलंकरण मानले जाते.  रामायणात सीता स्वयंवर प्रसंगी रांगोळ्या काढल्याचे उल्लेख ...

पोटभर मैत्री, पोटभर जीवनानंद! (काही अनुभवलेलं...)

  पोटभर मैत्री, पोटभर जीवनानंद!  (काही अनुभवलेलं...) रागी रोटी  (टीप - महाराष्ट्रेतर भागातील मराठी भाषिकांसाठी एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. मला मात्र या बद्दल शेवटच्या दिवशी सकाळी या बद्दल माहिती मिळाली. आयोजकांना सांगितले आजच्या आज अजिबातच शक्य नाही. त्या म्हणाल्या प्रयत्न तर करा. परंतु मला मात्र खात्री होती, की हे काही शक्य नाही, विचार सोडून द्यावा. तथापि थोडा वेळाने मला वाटले, मला या विषयावर मला बऱ्याच दिवसापासून लिहायचे होते. तथापि मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे या संधीचे सोने करावे. मग काय बाकी सगळी कामं बाजूला ठेवली आणि हे काम हातात  घेतले. लिहून पूर्ण झाल्यावरच उठले. तोच निबंध आज आनंदी पावसाच्या वाचकांसाठी! ऐन वेळेवर लिहिण्याचा पुष्कळ आनंद मिळाला, परंतु एका बाजूला वाटले निवांत लिहायला मिळाले असते तर अजून छान झाले असते. असो. आता तुम्ही वाचकाच ठरवा आणि आपल्या अभिप्रायातून सांगा लेखन कसे वाटले.) किती गुणगान I करावे मैत्रीचे I नाते हे खात्रीचे I फक्त एक II मैत्रीमध्ये नाही I सान थोर काही I सदा सम राही I मित्रवत II  जगामध्ये आहे I स्वार्थी नाते सारे I फक्...