Skip to main content

Posts

Showing posts with the label काही अनुभवलेलं..

अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष) (काही अनुभवलेलं..)

 🌷अडीच अक्षर - २ (मैत्री दिन विशेष)🌷  (काही अनुभवलेलं..)                भारतीय डाक विभागाने गेल्या वर्ष अखेर अडीच अक्षर/ढाई अक्षर अशा शीर्षकाखाली एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात मला माझा सहभाग नोंदवता आला नव्हता, तथापि त्याकारणे आनंदी पावसात "अडीच अक्षर" ह्या नवीन सदराची सुरुवात झाली. या सदरातील पहिला भाग प्रकाशित झालेला आहे. आज म्हणजे ३ ऑगस्ट २०२५ रोजी मैत्री दिनाच्या निमित्ताने हा दुसरा भाग आपल्या भेटीस येत आहे.                भारतीय टपाल खात्याशी अगदी लहान वयापासून ते आजतागायत माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या सर्व प्रवासात म्हणजे डाक विभागाशी संबंधित प्रवासात कायम साथ लाभलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी सख्खी मैत्रीण. वास्तुकला महाविद्यालयात असल्या पासूनची ही मैत्री आणि तितक्याच वयाचा हा आमचा सोबतीने केलेला टपाल-प्रवास. आज मैत्री दिनाच्या निमित्ताने या आनंदी प्रवासाची झलक आनंदी पावसाच्या वाचकांसाठी!                ...

👯💃 वार्षिक स्नेह संमेलन 💃👯(काही अनुभवलेलं...)

👯💃 वार्षिक स्नेह संमेलन 💃👯 (काही अनुभवलेलं...) दिनांक - ५ फेब्रु २०२५  वेळ - सायंकाळी ५ वाजता  स्थळ - ग्लोबल इंग्लिश मिडीअम स्कूल, नशिराबाद  शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन! साऱ्यांनाच खूप उत्सुकता असते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमंत्रित. साधारणपणे, प्रत्येकाला आयुष्यात दोन भिन्न काळातील वार्षिक स्नेह संमेलनाचा आनंद अनुभवायला मिळतो. एक म्हणजे स्वतः शाळेत असतांना  आणि दुसरे म्हणजे अपत्याच्या शालेय जीवनातील काळात. तथापि मला या व्यतिरिक्त सुद्धा हा आनंद नुकताच अनुभवायला मिळाला,  अगदी अनपेक्षितपणे... एका शाळेत वार्षिक संमेलनाची विशेष अतिथी म्हणून! तेही, आमचे मूळ गाव असलेले गाव म्हणजे नशिराबाद येथे! अगदी स्वर्गीय सुंदर असा अविष्कार-अनुभव! आपल्याला आयुष्यात कुठे नी कुठे सन्मान मिळतो, आपले कौतुक होते.  या सगळ्याचा आनंद असतोच! तथापि आपल्या मूळ गावी, आपलेपणाने विशेष आमंत्रित करून, सन्मानपूर्वक विशेष अतिथीच्या आसनावर आसनस्थ केले जाते, तो आनंद शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे...! असा आनंद अनुभवण्याची संधी मिळण्यास परमभाग्यच...

झळाळता रंगीत आनंद-१ (काही अनुभवलेलं...)

झळाळता रंगीत आनंद-१  (काही अनुभवलेलं...) रंग!  झळाळते रंग! झळाळता आनंद! झळाळत्या रंगांचा झळाळता रंगीत आनंद! अस म्हणतात मानव सोडला तर पृथ्वीतलावर बाकी कुठल्याही सजीवाला रंग दिसत नाहीत. सगळे रंग-आंधळे(colour-blind) असतात. त्यांना सगळे जग काळ्या रंगाच्या छटांचे दिसते. काय गम्मत आहे बघा, मानवाचा रंग पाहिला तर एकाच रंगाच्या विविध छटा आहेत. तथापि मानव वगळता सगळ्या सजीवांच्या रंगांत किती विविधता दिसते! एका प्रजातीच्या पक्षाचा रंग दुसऱ्या प्रजातीच्या पक्षापेक्षा फार भिन्न असतो. तसेच प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक, मासे आणि इतर लक्षावधी जलचर प्राण्यांच्या बाबतीत तसेच. कुठल्याही दोन प्रजातीचा रंग एकसारखा नसतो. परंतु किती विरोधाभास, ज्यांना हे निरनिराळे रंग या ब्राह्मडाच्या निर्मात्याने दिले आहेत, त्यांनाच हे रंग दिसत नाहीत.                     आणि दुसरी बाजू, मानवाला एकच रंग दिला आहे, पण त्याला मात्र सगळे रंग, त्याच्या विविध छटा बघता येण्याची दृष्टी निर्मात्याने दिली आहे. म्हणजेच त्या निर्मात्याने मानवाला निर्माण केले ...

🎲♟️पारंपरिक पट-खेळ ♟️🎲(काही अनुभवलेलं..,)

🎲♟️पारंपरिक पट-खेळ ♟️🎲 (काही अनुभवलेलं..,)                                 आज पट खेळांची संख्या खूपच वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या आणि माणसाची संपत्ती हाव. लोकसंख्या वाढीमुळे निवाऱ्याची गरज वाढलीच, तथापि आज मानवाला गरजेपुरता निवारा पुरेसा नाही. त्याला मोठ-मोठ्या शहरात तर आपली घरं असावी असे वाटते, सुट्टी साठी किंवा लहरीनुसार राहायला, थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा घर असावे असे वाटते. यापलीकडे जाऊन शेतावरही घर हवे असते. हे सगळे इथेच थांबत नाही तर, गुंतवणूक म्हणून सुद्धा शक्य तितकी घरं हवी असतात, प्लॉट हवे असतात. कधीही न संपणारी हाव. त्यामुळे मोठ्या शहरापासून लहान गावांपर्यंत मोकळ्या जागांचा, मैदानांचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे मुलांना बाहेर जाऊन खेळायला जागाच शिल्लक नाहीत...असो                                मुख्य विषय पट खेळ. अगदी एका पिढी पूर्वी असे नव्हते. मोजकेच पट खेळ होते आणि प्रत्येक पट खेळ प्रत्येकाकडे असेच असे...