Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

लोकमनातील पाणी - म्हणी व वाक्प्रचार (featured)

  लोकमनातील पाणी - म्हणी व वाक्प्रचार (featured)                 पाण्याच्या संबंधामध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये (लेखी आणि बोली) असंख्य म्हणी व वाक्प्रचार रूढ आहेत. प्रामुख्याने ते पाण्याचे निरनिराळे गुणधर्म(स्वभाव) स्पष्ट करणारे आहेत. यामध्ये काही संतवचनांचाही समावेश होतो. याची व्यापकता इतकी प्रचंड आहे की, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि भडोच पासून त्रिपुरा पर्यंत निरनिराळ्या साहित्यिकांनी, कवींनी, संतांनी पाण्यावर आपली मते भिन्न प्रसंगाच्या अनुषंगाने व्यक्त केली आहे. विनोबांनी म्हटले आहे की, गंगाजल म्हणजे केवळ दोन भाग हायड्रोजन आणि एक भाग प्राणवायू असे समजू नये, गंगेत स्नान करणाऱ्यांचे शरीर स्वच्छ होईल; परंतु शिवाच्या जटामुकुटामधून प्रवाहित झालेली कलिमलध्वंसिनी भागीरथी म्हणून स्नान करणाऱ्याचे शरीर तर स्वच्छ होईलच, पण मनही पवित्र आणि प्रसन्न होईल. यावरून पाणी हा नुसता भौतिक अथवा व्यापारीमूल्य असणारा पदार्थ नसून या उभयतापेक्षा त्याचे सांस्कृतिक मूल्य कित्येक पटीने मोठे आहे. म्हणून पाण्याच्या संबंधात शेकडो पर्यायी शब्द निरनिराळ्या...