Skip to main content

भाग - ४(निवडक रा श्री मो)


भाग-४

(निवडक रा श्री मो) 

 


आजची पुढील सर्व वाक्यं डॉ रा श्री मोरवंचीकर लिखीत 
"येई परतुनी ज्ञानेश्वरा" 
या ग्रंथातील आहेत. 

🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔

🌸💫पारायण हा शब्द परा आणि आयन या शब्दांपासून तयार झालेला आहे. परा म्हणजे परमेश्वर आणि आयन म्हणजे त्याचे अस्तित्व, त्याचे चलनवलन, त्याचे कर्तृत्व. म्हणजे परमेश्वराच्या व्याप्तीचा शोध घेण्याचे कार्य पारायणातून साधावे आणि भक्त व परमेश्वर यांच्यामध्ये असलेले व्दैत दूर व्हावे अशी त्यामागील भूमिका असते. परंतु पारायणाचा संबंध सकाम भक्तिशी जोडला गेला तर तो पारायणाच्या मूळ हेतूपासूनच अभ्यास शेकडो मैल दूर जातो.💫🌸 

🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔 🪔 🪔

🌸💫महाभारत हे संघर्षाचं प्रतीक आहे, गीता कर्माचे, भक्तीचे, योगाचे, ज्ञानाचे प्रतीक आहे तर उपनिषदे ही जिवा-शिवाच्या मैत्रीची प्रतिके आहेत.💫🌸

🪔🪔🪔 
🌷🌷🌷
🪔🪔🪔

🌸💫प्रामाणिक वारकऱ्यांच्या दृष्टीकोनातून सर्वात भव्य मंदिर अंतःकरणातच असते.💫🌸

🌷🌷🌷
🪔 🪔 🪔 
🌷🌷🌷

🌸💫लोकजीवनाला कल्याणकारी मार्ग दाखविणे, म्हणजेच विश्व मोहरे लावणे, लोकमानसात आत्मविश्वास निर्माण करणे आणि प्राप्त जीवन सुखी जगण्यासाठी समाजासमोर आदर्शमूल्ये ठेवून त्याला जगण्याची प्रेरणा देणे हे कुठल्याही राष्ट्राचे आद्य कर्तव्य ठरते. या निकषावर ज्ञानदेवांचे कार्य तपासून पाहिल्यास त्यांच्या कार्याचे अलौकिकत्व समजण्यास मदत होते.💫🌸

🌷🌷🌷
🪔 🪔 🪔 
🌷🌷🌷

🌸💫जोपर्यंत समाजात प्रामाणिकपणा आणि मानवता या मूल्यांचा प्रामाणिकपणे स्वीकार होत नाही, तोपर्यंत समाज भयमुक्त होणार नाही आणि ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे या सर्वाचे मूळ कारण म्हणजे प्रत्येकजण स्वधर्म विसरलेला आहे. स्वधर्म ही फार मोठी संकल्पना आहे. तथापि तिचा प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ लावून जगण्याची शैली निर्माण केली आहे. जगा आणि जगवा याची जागा केवळ जगा आणि इतरांना जगविण्याचा विचार सोडून द्या. परिणामी खऱ्या आनंदापासून समाज फार दूर गेला आहे.💫🌸

🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷

©️आनंदी पाऊस
(निवडक रा श्री मो) 
१जाने२०२३   












Comments

  1. || निवडक-४ भागातील आनंदीकण वाचताना आम्हास Spiritual ,मार्मिक,Good Thoughts ची Power मिळाल्या सारखी वाटले बरे||
    ...पुढिल निवडक -५ वाचण्यासारखं ऊत्सुक.

    ReplyDelete
  2. वारकऱ्यांच्या दृष्टीकोनातून सर्वात भव्य मंदिर अंतःकरणातच असते अगदी खरे
    सर्वच विचार छान

    ReplyDelete
  3. खूप सुंदर उद्बोधक वाचनीय स्मरणीय खूप छान वेचक नेमके शब्दार्थ असलेले खूप सुंदर परामर्श तयार झालेला आहे असेच ज्ञानवर्धक माहिती करता सतत पुरवठा करून आणखी बौद्धिक पातळी वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  4. प्रतिभा अमृतेFebruary 19, 2023 7:52 pm

    निवडक रा श्री मोरवंचीकर यांनी विशद केलेले पारायण, महाभारत, उपनिषदे, गीता यांचे मितितार्थ वाचून आपल्या मूढ मतीची कीव करावीशी वाटते. सकाम भक्ति किंवा कर्मकांड आपल्याला मूळ भक्तीपासून वंचित करतात हे मनोमन पटते. तू सुरू केलेला हा उपक्रम आमच्या माहीतीत नुसता भर टाकत नाही तर अंतर्मुख करतो. खूप खूप धन्यवाद. 👍

    ReplyDelete
  5. Rigorventure@gmail.comFebruary 25, 2023 2:48 pm

    आजचा लेख हा एक अर्थाने लेख नव्हेच. मोरवंचीकरसरांच्या लिखाणातले काही तुला भावलेले आनंदी कण तू वाचून शेअर केलेले आहेत. एक तर मी ज्ञानेश्वरी किवा सरांचं त्या विषयावरचं निरुपण वाचलेलं नाही . त्यामुळे त्यांच्या पैठणीला मी माझी ठिगळं काय लावणार ? शिवाय अध्यात्म ह्या विषयाचं काहीही गम्य किंवा ज्ञान नसल्यामुळे ह्या तुझ्या लेखावर काहीही लिहायला किंवा टिप्पणी करायला मी असमर्थ आहे. त्याबद्दलक्षमस्व....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  6. I salute you।।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

वस्तु - तुपाच्या वाढया (वारसा स्पर्धा)

वस्तु - तुपाच्या वाढया  (वारसा स्पर्धा)                                                 मानव अगदी सुरवातीपासूनच समुदायांनी, टोळ्याटोळ्यांनी राहत असे. नंतर एकत्र कुटुंब पद्धती . आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती, त्यातही प्रत्येक वस्तू प्रत्येकाची वैयक्तिक. त्यामुळे घरातीलच सदस्यांचा एकमेकांशी संबंध फारच कमी, नगण्य. शिवाय आर्थिक सुबत्ता, नको वाटावी इतकी जास्त. त्यामुळे एकमेकांची गरजच नसल्यात जमा, रोजच्या दैनंदिन जीवनात आणि सण-समारंभात सुद्धा.                                                 पूर्वी तसे नव्हते. हे पूर्वी म्हणजे फार पूर्वीही नाही, अगदी दोन पिढ्या आधी. कुटुंब तर एकत्र होतीच आणि आजच्या इतकी आर्थिक सुबत्ताही नव्हती. त्यामुळे सगळेच सगळ्यांवर कुठल्या नी कुठल्या कारणाने अवलंबून असत. त्यामुळे सगळेच एकमेकांना धरून र...