भाग-८
(निवडक रा श्री मो)
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔ज्ञानदेवांचे नामदेवांकडे जाणे आणि
नामदेवांचे ज्ञानदेवांबरोबर प्रवास करणे
हा ज्ञान आणि भक्ती या मोक्षमार्गावरील दोन प्रवाहांचा मनोज्ञ संगम होता.🪔
🏵️🏵️🏵️
🪔ज्ञानदेव आणि नामदेव यांच्यामध्ये,
म्हणजेच शिव आणि विष्णू मध्ये असलेले
द्वैत संपून शिव विष्णुमय झाला आणि विष्णू शिवमय झाला.
म्हणून ज्ञानदेवांनीच म्हटले आहे,
"विठूने शिरी वाहिला देवराणा."
"देवराणा" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष महादेव म्हणजे शिवलिंग होय. 🪔
🏵️🏵️🏵️
🪔आळंदी ते पंढरी हा प्रवास आजच्या महाराष्ट्राच्या आध्यात्माचे नुतनीकरण करण्यात,
ज्ञानेश्वरांची चेतना दुःखीतांपर्यंत, आर्तापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाला आहे,
असे जमणाऱ्या भाविकांच्या सळसळत्या चैतन्यावरून वाटते.🪔
🏵️🏵️🏵️
🪔काही माता-भगिनींच्या माथ्यावर मानाची तुळस असते.
पायातील वाहणांकडे कुणाचे लक्ष नसते.
कधी तुटकी वहाण तर कधी अनवाणी
अशा उन्मनी अवस्थेतून यांची वाटचाल होत असते.
एखाद्या दूरस्थ खेड्यामधून आलेल्या ८०-८५ वर्षांच्या भक्ताच्या सहवासातून
आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन कधी घडते कळतही नाही. 🪔
🏵️🏵️🏵️
🪔दुर्दैवाने अलीकडे याच्यामधील(वारीमधील) पंचतारांकित भक्तांची संख्या वाढीस लागलेली दिसते.
भक्तिभावाच्या या चैतन्यमयी वाटचालीचे सुख-सोयीने-युक्त,
मधुर स्वादास चटावलेल्या पर्यटन वारीमध्ये रुपांतर न होवो, ही परमेश्वर चरणी विनंती.🪔
🪔🏵️🏵️🏵️🪔
🪔🏵️🏵️🏵️🪔
ज्ञानदेवें रचिला पाया ।
ReplyDeleteउभारीलें देवालया।
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार 🙏🏻
🙏🙏🙏
ReplyDelete||भक्तीमय व शक्तीमय वारी होणे निश्चिंत ||
ReplyDeleteसारे सुरचितच...ओवी व अभंगांचा विस्तार जाहला पाहिजे..अध्ययनात. ..