Skip to main content

भाग-९ (निवडक रा श्री मो)


भाग-९   

(निवडक रा श्री मो) 





🪔🪔🪔
🪔🏵️🏵️🏵️🪔
🪔🪔🪔



ज्ञानेश्वर-तुकारामांच्या दिंड्यांमध्ये सामील होऊन पंढरीची वारी करण्याची 

स्पर्धा अलीकडे उच्चविद्या विभूषितांमध्येही पहावयास मिळते. 

शिक्षित-अशिक्षित वारकरी वर्षानुवर्षे दिंड्या-पताकांचे पालख्यांचे वारसदार आहेतच. 

पण अहंकार विसरून हे तथाकथित विद्याविभूषित खऱ्या अर्थाने वारकऱ्यांपर्यंत पोहोचत असतील 

तर भावी काळात समाजधारणेत परिवर्तन झाल्याचे दृश्य खरोखरच पहावयास मिळू शकेल आणि ज्ञानेश्वरांनी

 अपेक्षा केल्याप्रमाणे "विश्व हे मोहरे लावावे" याची अनुभूती कदाचित येऊ शकेल. 


🌸🌼🌸🌼🌸
🌸🪔🌸🪔🌸
🌸🌼🌸🌼🌸


अहंकाराचा त्याग ही असामान्य बाब या वारकऱ्यांनी सहजतेने आचरणात आणलेली असते. 

ही सहजता ज्याला ज्ञानदेवांनी सहजसमाधी असे म्हटले आहे, 

ती सहजसमाधी विठ्ठल भक्तीने भारावलेल्या या समाजाचे अविभाज्य अंग असते.


🌸🪔🌸🪔🌸
🌸🌼🌸🌼🌸
🌸🪔🌸🪔🌸


सर्व सजीवांमध्ये खलप्रवृत्तीचा अंश कायमच कार्यरत असतो. 

या खलप्रवृत्तीला आपण प्रयत्नपूर्वक कसे रोखू शकतो यावरच कुटुंबातील, 

समाजातील तथा राष्ट्रातील संतुलन अवलंबून असते.
 
ज्ञानदेवांचा संघर्ष हा खलांविरुद्ध नसून खलप्रवृत्तींच्याविरुद्ध होता. 

म्हणून ज्ञानेश्वरांचे अवतार कार्य हे कालातीत मानले जाते. 


🌷🪔🌷🪔🌷
🌷🌼🌷🌼🌷
🌷🪔🌷🪔🌷



सकाम कर्माचा त्याग, जीवा-शिवाचे अद्वैत, 

जन्म-मृत्यूचा पाठलाग ही वैश्विक प्रक्रिया असून 

याविषयी कोणताही अहंकार तथा ममत्व न बाळगता 

त्यामध्ये सहज सामावून जाणे ही ज्ञानेश्वरांची शिकवण आहे. 

हेच जीवाचे कर्तव्य आहे. 

मोक्षाप्रत नेणाऱ्या साधनांची आवश्यकता ही कालातीत गरज असणार आहे - म्हणून ज्ञानेश्वरी!


🌷🌼🌷🌼🌷
🌷🪔🌷🪔🌷
🌷🌼🌷🌼🌷



संपूर्ण ज्ञानेश्वरीभर त्यांनी कुठेही कोणत्याही फलाची याचना केलेली नाही 

किंवा आपण स्वतः तथा हा समाज पापी आहे आणि आमचा उद्धार कर,

अशी करुणाही भाकलेली नाही.
 
कारण त्यांना आत्मविकासावर आत्म्याच्या प्रकाशावर विश्वास होता. 

म्हणून नऊ हजार ओव्यांचा नैवेद्य समर्पिला गेल्याने संतुष्ट झालेल्या 

सर्वात्मक देवाकडे त्यांनी खळांची व्यंकटी नष्ट करण्याचे दान मागितले आहे. 

त्यांचे शत्रुत्व खलाशी नसून खल-प्रवृत्तीशी आहे. 


🪔🪔🪔
🪔🌷🌷🌷🪔
🪔🪔🪔


  

Comments

  1. खूप सुंदर ! 👌👌🙏

    ReplyDelete
  2. Divineच अगदी...परत एकदा peace of mind, good thoughts & आनंदी ऊर्जा प्राप्त होणे निश्चिंत. ...वाचून आनंद जाहला...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...