सोमवारची कहाणी-१
(घरातील गमती जमती)
आजपर्यंत सगळ्यांनी अनेक धार्मिक पुस्तकांमधून सोमवारची कहाणी वाचली/ऐकली असेल . पण आज मी चौधरी कुटुंबातील सोमवारची कहाणी सांगणार आहे. जी कहाणी या सगळ्या कहाण्यांपेक्षा खूप वेगळी आहे. व्रताचीच आहे, पण एका खूप आगळ्या वेगळ्या व्रताची! एका त्यागाची, एका जाणिवेची, एका जबाबदारीची!! देशप्रेमाची!!!
योगायोग असा की आज सुद्धा सोमवार आहे, म्हणजे हे लिखाण मी सोमवारीच केले, ठरवून नाही. लिहायला बसल्यावर लक्षात आले. दुसरा योगायोग म्हणजे आज मी साबुदाण्याची खिचडी केली आहे, जी मी फारच क्वचितच करते. उपवास आणि साबुदाणा खिचडीचा संबंध, मी काही इथे सांगण्याची गरज नाही. या सगळ्या योगायोग मुळे, मी अगदी प्रत्यक्षपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते आणि लिहीत होते!
आमच्याकडे अगदी सुरवाती पासून, सकाळी सात-साडेसात वाजताच सगळा स्वयंपाक तयार असे , रविवार आणि सोमवार वगळता. आता रविवारी सुट्टी म्हणून थोडा उशीर होत असे, तरी रविवारी सुद्धा एकद्या तासाच्या फरकाने तयार असेच. सोमवार सोडला तर बाकी दिवशी सगळी पुरुष मंडळी आणि शेतात जायचे असेल तर, आई(आजी) सुद्धा जेवण करून साडे आठच्या आसपास रवाना होत असत. याला अपवाद होता सोमवारचा! सोमवारी सुद्धा सगळी मंडळी ठरलेल्या वेळीच रवाना होत आपापल्या कामासाठी, पण न जेवता. कारण दर सोमवारी घरात अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा उपवास असे. दिवसातून फक्त एकदाच, दुपारी स्वयंपाक होत असे. दर सोमवारी सगळी पुरुष मंडळी दुपारी घरी जेवायला येत. हे सोमवार दुपारचे जेवण इतर दिवशीच्या जेवणापेक्षा थोडे वेगळे असे. सकाळी नाश्ता वगैरे प्रकार नव्हताच. अगदी एखाद्या सोमवारी सकाळी शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू किंवा गुळदाणे केले जात. मग सगळे यातील थोडं थोडं खाऊन जात असतं.
बरं, संध्याकाळी जेवण तर नसेच, पण घरातील सगळी मोठी मंडळी काहीच खात नसतं, एकदम कडक उपवास! आम्हा मुलांना भूक लागली आणि काही खायचे असेल तरी, स्वयंपाक होत नसे. दुपारचे उरलेले असेल तेच खावे लागे. कधी कधी मला फार राग येत असे. पण घरात काही नियम होते, शिस्त होती. ते सगळे नेहमीच पाळले जात असतं. कुणीही प्रश्न करत नसे किंवा ते नियम, ती शिस्त कोणीही मोडत नसे. अगदी जन्मापासून बघत आलो हे सगळं. नंतर पुढे वाढत्या वयाने भूक वाढत गेली, मग यात काही बदल झाले. ते सगळे नंतर सांगेनच सविस्तर कधीतरी.
वाचकांच्याही लक्षात आले असेल, खाण्याच्या बाबतीत आमचे सगळे कुटुंब किती उत्साही आणि रसिक! तरी हे सगळे काय? माझ्याही मनात हेच विचार येत होते, हे लिखाण सुरु केल्यापासून. अगदी एकादशीला सुद्धा, "एकादशी नी दुप्पट खाशी" अशी परिस्थिती असे. मग सोमवारीच असे का? बरं आमचे बाबा(आजोबा) पूर्णपणे नास्तिक, कधीच कुठल्या देवळात गेले नाहीत की घरातील देवांना नमस्कार केला नाही. एव्हढेच काय पण आमची आई(आजी) चारधाम यात्रेला सुद्धा एकटीच गेली, ते गेलेच नाही. फक्त दोनच गोष्टींवर त्यांची श्रद्धा! एक म्हणजे दररोज दुकानात गेले की दुकानाच्या(खादी भांडार) पायरीला नमस्कार करीत, मगच वर चढत, आपण देवळात करतो तसे. दुसरे म्हणजे वर्षातून तीन वेळा पितरांचे श्राद्ध घातले जाते. ते असतांना, ते आगारी(या बद्दल सविस्तर माहीती एका स्वतंत्र लेखात कळेलच) टाकत आणि पूजा करत. तेव्हा ते आपल्या पितरांना अगदी पूर्ण श्रद्धेने आणि आदराने नमस्कार करीत!
मग हा सोमवारचा उपवास का? तोही इतका कडक का? आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती का करते? बरं मी मोठी होईपर्यंत त्याला बरेच धार्मिक स्वरूपही आले होते. आई(आजी) म्हणे शंकराचा उपवास आहे, एकदा केला की सोडता येत नाही, कायमच करावा लागतो. बाकी उपवासाचे उद्यापन करून, ते थांबवता येतात. पण सोमवारचे तसे नाही वगैरे वगैरे. पण बाबा हे सगळे मानणाऱ्यातील नव्हतेच कधी. कितीतरी कठीण प्रसंगांना तोंड दिले, पण अगदी धीराने! कधीही देव वगैरे चा आधार घेतला नाही. पण ते सुद्धा हा सोमवारचा उपवास करीत होते, अगदी कडक!
हे लिखाण चालू केले तेव्हा ते या जगात नव्हतेच. त्यामुळे त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणे शक्यच नव्हते . पण या ना त्या कारणाने दादा(माझे वडील) आणि बाकी मंडळींशी चर्चा होतच असते. असेच एकदा दादांशी चर्चा चालू असतांना, हा विषय निघाला. मग मी त्यांना विचारले, हे असे कसे? का हा उपवास? वगैरे वगैरे. मग त्यांनी या सोमवारच्या कडक उपवासाचा उगम आणि गोष्ट सांगितली. ती गोष्ट मनाला आणि बुद्धीला नुसती पटलीच नाही, तर आणखी या एका गोष्टी मुळे बाबांबद्दलच्या अभिमानाने उर भरून आला! मनोमन त्यांना आदरपूर्वक वंदन करून, त्यांना एक घट्ट मिठी मारली! कारण त्यांनीच हा सोमवारचा कडक उपवास आमच्या घरात चालू केला होता! मधल्या काळात वसतिगृहातील रहिवास आणि आता बऱ्याच काळानंतर तब्बेतीच्या कारणांनी सोमवारचा उपवास मधेच खंडित झाला होता, आता कायमचा सुटला. त्याबद्दल अधून मधून मनात विचार येत, कधी थोडी भीती सुद्धा वाटे, पाप लागेल का? वगैरे वगैरे. पण ही गोष्ट ऐकली आणि आभाळ एकदम स्वच्छ आणि निरभ्र झाले! छान "झाले मोकळे आकाश" चा अनुभव आला. सगळी भीती पळून कुठल्या कुठे गेली.
"जय जवान, जय किसान" हा नारा सगळ्यांनाच माहितीचा, माझ्या सुद्धा माहितीचा. पण या निमित्ताने मला याचा खरा आणि नीट अर्थ कळला. मला जसा आणि जितका समजला तितका सांगण्याचा प्रयत्न करते. शास्त्रीजी पंतप्रधान झाले तो काळ फार संघर्षाचा होता. चीनशी झालेल्या युद्धात, देशाचे प्रचंड नुकसान झालेलं होते. उद्योगधंदे हेलकावत होते, बेरोजगारीचे प्रमाण वाढत होते, लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती. त्यातच भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले. भारतातील अन्नधान्यांचा साठा वेगाने कमी होत होता. गहू आणि इतर धान्याची अमेरिकेकडून मदत घेणे, हा एक उपाय त्यांच्या समोर होता. पण त्यासाठी अमेरिकेच्या जाचक अटी स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यावेळी जनतेला संबोधित करतांना घोषणा केली "जय जवान, जय किसान." ज्याप्रमाणे हातात बंदूक घेऊन आपले जवान शत्रूशी लढत आहेत, त्याप्रमाणे शेतात राबणारा शेतकरी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे हा संदेश दिला! क्षणभर थांबा आणि आजही विचार करून बघा, किती मोलाचा आणि आजही लागू पडणारा संदेश त्यांनी दिला.
यासोबतच जनतेला एक महत्वाचे व्रत सांगितले "एक वेळ उपवास पाळण्याचे व्रत." ते आपल्या भाषणात म्हणतात, "हमें भारत का स्वाभिमान बनायें रखने के लिये देश के पास उपलब्ध अनाज से ही काम चलाना होगा. हम किसी देश के आगे हाथ नहीं फैला सकते. यदी हमने किसी देश द्वारा अनाज देने की पेशकश स्वीकार की तो यह देश के स्वाभिमान पर गहरी चोट होगी. इसलिये देशवासियों को सप्ताह में एक वक्त का उपवास करना चाहिए. इससे देश इतना अनाज बचा लेगा की अगली फसलं आने तक देश में अनाज की उपलब्धता बनी रहेगी."
जवानांना अन्नधान्य पुरावे म्हणून, त्यांच्यासाठी जनतेने आठवड्यातून एक वेळ उपवास ठेवावा. हे जनतेला सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतःही याचे पालन केले. पंतप्रधान निवासात सुद्धा आठवड्यातून एक वेळ अन्न शिजत नसे. देशभरात याचा परिणाम झाला. शहर असो की खेडे, प्रत्येक घरात सोमवारी किंवा मंगळवारी एक वेळेचं जेवण शिजले नाही. आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाने उपवास केला. शास्त्रीजींच्या या कल्पनेला हिंदीत "अनाज यज्ञ" म्हणून ओळखले जाते. आजही अनेक घरात हा उपवास केला जातो . त्यातीलच एक घर म्हणजे, "चौधरी सदन!"
जयहिंद!!!
भारत माता की जय!!!
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
३१ मे २०२१
मुख लिंग , उदयगिरी , मध्य प्रदेश
पाचव्या शतकातील आहे
मुख लिंग , उदयगिरी , मध्य प्रदेश
पाचव्या शतकातील आहे
मूर्ती लहान , पण कीर्ती महान !
लाल बहादूर शास्त्री
(भारताचे दुसरे पंत प्रधान)
Nice one
ReplyDeleteThnk u so much 😊 😍
Deleteशब्दांकन लय भारि आहेच पण आशय पण तडपदार मांडला गेला आहे
ReplyDeleteआभाळभर प्रेम 😍 😇!!!
DeleteMast mejavni shabdanchi
ReplyDeleteअरे व्वा!! खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Delete👌👍🤗
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
DeleteKhup ch chhan aahe
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteKhup sunder mahiti somavar upavas chi v tuzya lahanpanichya sarv aathavani likhanatun samjatat
ReplyDeletePhotos pan chan
माझ्या ब्लॉग च्या नियमित वाचकांपैकी तू एक आहेस , फारच आनंद होतो मला नेहमीच तुझे अभिप्राय वाचून ! खूप सारे प्रेम !!🤩😍
DeleteKhupach chan lekh 👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 😍 😇
DeleteKhoopach chan varnan 👌
ReplyDeleteKharach Upwas karnamagil udesh, nichay 👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
DeleteGreatच अँड hats off you all.उपवास व त्या मागच्या भावना,श्रद्धा उत्कृष्टरीतीने मांडलेले आहे.
ReplyDeleteअनाजयज्ञा ची संकल्पना माला आपल्या लेखातुनच प्रचितीस
आली.
खूप सारे सप्रेम धन्यवाद संजिता !! आणि मला या सगळ्या गोष्टी आमच्या या वारसा लिखाणामुळे कळल्या ..... 🙏🤩😇
Deleteबापरे मला तर यातले काहीच माहीत नव्हते सोमवार करण्यामागील उद्देश!
ReplyDeleteबाबांना खरेच मानले. खरे देशभक्त.
लेख लय भारी.
हं .... लिखाणामुळे मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्याच कुटुंबाबद्दल आणि आपल्या माणसांबद्दल कितीतरी गोष्टी माहिती झाल्या . सगळ्याबद्दल चंद्रमोहन सरांचे किती आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत !
Deletein a way we all are blessed soul !!😇😇🤩
मी आज सोमवार ची कहाणी वाचली मला तर खूप खूप आवडली तसा माझा इथे दर आठवड्याला सोमवारचा उपास असतो त्यामुळे खूप भावलं म्हणाला खरंच खूप खूप खूप छान (सोमवारची कहाणी��������
ReplyDeleteवावा , छानच ! खूप खूप सप्रेम धन्यवाद !🙏😇
DeleteChhan Chhan. Uttareshwar Mandira paithan, there the Shiva icon is shown with five mukhalingas !!🙏🏻👌👣
ReplyDeleteछान
ReplyDeleteआपले आजोबा खरे देशभक्त होते. माझ्या बाबांनी असाच देशाभिमान होता ताई.
ReplyDeleteखुप सुंदर, असे काही होते हे माहिती नव्हते
ReplyDelete👌👌👌 khupch chan
ReplyDelete👍👍
ReplyDeleteछान लिहिलय...
"साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"
देशप्रेमाचे एक अद्भुत व उत्तम उदाहरण...
*👍Great Leader ... Respected Follower's...... Loving new generation following the foot prints of predecessors.👌🌹*
ReplyDeleteखुप छान लिखाण केले.त्यावेळी सर्व भारतभर युध्दामुळे देश भक्तीची गाणिपण म्हटली जायची .आणि देशात शास्त्रीजींच्य घोशणांचाही परिणाम होता.सर्व लोक उपवास करत .त्यावेळच्या आठवणि ताज्या केल्या तुझ्या लेखाने .लेख खुपचं छान झालेला आहे.
ReplyDelete