Skip to main content

Posts

Showing posts from September, 2024

🎲♟️पारंपरिक पट-खेळ ♟️🎲(काही अनुभवलेलं..,)

🎲♟️पारंपरिक पट-खेळ ♟️🎲 (काही अनुभवलेलं..,)                                 आज पट खेळांची संख्या खूपच वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या आणि माणसाची संपत्ती हाव. लोकसंख्या वाढीमुळे निवाऱ्याची गरज वाढलीच, तथापि आज मानवाला गरजेपुरता निवारा पुरेसा नाही. त्याला मोठ-मोठ्या शहरात तर आपली घरं असावी असे वाटते, सुट्टी साठी किंवा लहरीनुसार राहायला, थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा घर असावे असे वाटते. यापलीकडे जाऊन शेतावरही घर हवे असते. हे सगळे इथेच थांबत नाही तर, गुंतवणूक म्हणून सुद्धा शक्य तितकी घरं हवी असतात, प्लॉट हवे असतात. कधीही न संपणारी हाव. त्यामुळे मोठ्या शहरापासून लहान गावांपर्यंत मोकळ्या जागांचा, मैदानांचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे मुलांना बाहेर जाऊन खेळायला जागाच शिल्लक नाहीत...असो                                मुख्य विषय पट खेळ. अगदी एका पिढी पूर्वी असे नव्हते. मोजकेच पट खेळ होते आणि प्रत्येक पट खेळ प्रत्येकाकडे असेच असे...

🐈🐈वाघाची मावशी🐈🐈

🐈🐈वाघाची मावशी🐈🐈 खरतरं हे उंदीर मामाचे मानाचे दिवस!  तथापि ह्या वाघाच्या मावश्यांनी प्रचंड धुमाकूळ घातलाय बऱ्याच काळापासून. हत्ती मालिका पूर्ण झाली, वृक्ष मालिका सुद्धा झोकात चालू आहेच. परंतु सुरुवात मनीमाऊच्या मालिकेने झाली होती. बऱ्याचशा मनीमाऊ इथे प्रकाशित झाल्या, तरीही बऱ्याच बाकी आहेत. त्या मला खूपच छळत आहेत. मी झोपली की, एक माझ्या डोक्यावर टुणकन उडी मारते, एक माझ्या पोटावर येऊन बसते, एक पायाशी येऊन झोपते, काम करायला लागले की एखादी पायात घोटाळत असते, लॅपटाॅप घेतला हातात की एखादी बटानांवर येऊन बसते, तर एखादी मांडीवर. आमचा नंबर कधी येणार? असा सततचा प्रश्न विचारत असतात.  त्यामुळे आज उंदीर मामाचा मान असला तरी आनंदी पावसात मात्र या वाघाच्या मावश्यांचा मान! एक दारा आडून बघतेय कधी नंबर लागतो याची वाट बघत. एक वाट बघून आळसावल्याचे नाटक करतेय लाडात येऊन. तर एक आपल्या समस्त पिल्लांसह माझ्याकडे बघतेय, एक मासा तोंडात धरून पोझ देतेय, एक तर चक्क योग करतेय, दोघी रुसल्याचे नाटक करत एकमेकींकडे पाठ करून बसल्यात, तर हे एक कुटुंब चेहऱ्यावर शून्य भाव असल्...

सुचलेलं काही-८ (काही अनुभवलेलं...)

सुचलेलं काही-८  (काही अनुभवलेलं...) 

🐖 निमित्त, वराह जयंतीचे🐖

🐖  निमित्त, वराह जयंतीचे🐖  भगवान विष्णूंनी दहा अवतार घेतले असे मानले जाते. १. मत्स्य अवतार - माश्याच्या रूपातील अवतार  २. कूर्म अवतार - कासवाच्या रूपातील अवतार  ३. वराह अवतार - डुकराच्या रूपातील अवतार ४. नरसिंह किंवा नृसिंह अवतार - अर्धे शरीर सिंहाचे आणि अर्धे शरीर मानवाचे  ५. वामन अवतार - बटू ब्राह्मण रूपातील अवतार  ६. परशुराम अवतार - ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार  ७. श्रीराम अवतार - मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार  ८. श्रीकृष्ण अवतार - १६ कला अवगत असलेला पूर्णावतार  ९. बुद्ध अवतार - क्षमा, शील आणि शांती रूपातील अवतार  १०. कल्की अवतार - हा अवतार कलियुगाच्या शेवटी होणार असे मानले जाते(सृष्टीच्या संहारक रुपात)  वराह अवतार  हा  विष्णूच्या  दशावतारां पैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात  श्रीविष्णूने वराहाचे   म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते.  ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.   ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणून त्या दिवशी वराह जयंती अ...