Skip to main content

भाग-७ (निवडक रा श्री मो)

 भाग-७  

(निवडक रा श्री मो) 


🌷🌷🌷

🪔🪔🪔

🌷🌷🌷


🌺🌺🌺ज्ञानेश्वरीमध्ये उपयोजिलेला एकही शब्द हीन दर्जाचा,
 
मनाला बोचणारा, समाजबाह्य तथा रूढीबाह्य 

असा शोधूनही सापडणार नाही. 

त्यांचे निरुपण म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसून भाव-रसांचा,
 
ज्ञानेंद्रियांना तृप्त करणाऱ्या अमृतसरितेचा महापूर आहे.🌺🌺🌺


🪔🪔🪔


🌺🌺🌺ज्ञानेश्वरी इतका लोकप्रिय ग्रंथ महाराष्ट्रात दुसरा आढळणार नाही.
 
ज्ञानेश्वरी समजो, न समजो, तिचं पारायण करण्याची संधी मिळो न मिळो,

पण ज्ञानेश्वरी घरात असण्याचा आनंदही शब्दातीत आहे.

घरात ज्ञानेश्वरी असणे म्हणजे मात्यापित्यांचे 

विशेषतः माउलीच्या अस्तित्वाचे प्रतिक मानले जाते.🌺🌺🌺


 🪔🪔🪔


🌺🌺🌺माऊली हे बिरूद लोकांनी स्वतःहून त्यांना अर्पण केलेले आहे. 

म्हणून ज्ञानदेव शब्द उच्चारताच स्वतःच्या माऊलीची आठवण तर होतेच होते, 

शिवाय आपल्या पाठीशी माऊली असल्याचा भास होतो. 

ज्ञानेश्वरीचे पारायण करताना आपण ठायी-ठायी वात्सल्याने चिंब-चिंब होऊन जातो. 

क्षणाक्षणाला गहिवरून येते. याची मोकळी प्रचीती आषाढीच्या पंढरपूर वारीत घेता येते.🌺🌺🌺


 🪔🪔🪔



🌺🌺🌺ज्ञानदेवांना माऊली का म्हटले जाते? 

साधारणपणे दहाव्या वर्षी मातृ-पितृ छत्र हरपल्यावर 

आणि निवृत्ती खऱ्या अर्थाने वृत्ती विरहित, 

अत्यंत ब्रह्मनिष्ठ करडे योगी असल्याने, 

त्यांनी स्वतःच निसर्गात केव्हाच विसर्जन केले असल्याने 

ते केवळ देह धर्माने अस्तित्वात होते. 

द्वेष, राग, लोभ, मोह, मद या सर्वांच्या ते अतीत असल्याने 

ज्ञानेश्वरांना आपले असे कोणीच नव्हते.
 
त्यात मुक्ताई चार वर्षांची, सोपान सहा वर्षांचे
 
आणि स्वतः ज्ञानदेव दहा वर्षांचे.
 
निवृत्ती मुक्त असल्याने त्यांना आपल्या प्रपंचाशी काही देणे-घेणे नव्हते. 

मग ज्ञानदेवांशिवाय ही दोन पोरं अन्य कोणाच्या मायेच्या छत्राखाली वावरणार?🌺🌺🌺


🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔

Comments

  1. ज्ञानेश्वर माऊली🙏🏻

    ReplyDelete
  2. माऊली माऊली माऊली!

    ReplyDelete
  3. माऊली माऊली माऊली!

    ReplyDelete
  4. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानबा तुकाराम
    ज्ञान माऊलींना साष्टांग दंडवत
    त्याचबरोबर तुमचेही खूप अभिनंदन तुम्ही खूप
    नव नवीन वैचारिक माहिती देतात. 💐🙋‍♀️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...