Skip to main content

व्यक्ती पितापुत्राची जोडी (माझा वारसा)

 व्यक्ती-पितापुत्राची जोडी 

(माझा वारसा)


                                          आमचे सुरुवातीपासुन एकत्र कुटुंब . आजीआजोबा , आईवडील , दोन काका-काकू आणि आम्ही सात बहिणी , दोन भाऊ . एकत्र राहत असल्या कारणाने सगळी नाती एकदम घट्ट होती . ज्या हक्काने आईच्या माहेरी , आजोळी जात असु सुट्टीचे , त्याच हक्काने काकूंच्या माहेरी सुद्धा जात असु . त्यामुळे आम्हाला तीन आजोळ ! केव्हढी श्रीमंती!
                                          ही पितापुत्रांची जोडी म्हणजे माझे पणजोबा आणि आजोबा  , म्हणजे माझ्या सगळ्यात धाकट्या काकूचे आजोबा आणि वडील ! सुका मन्साराम खडके (१८७५-१९८५) पणजोबा , एकशे दहा वर्षांचे निरोगी आयुष्य जगले . शिक्षण अजिबात नाही , शेती हाच व्यवसाय . शिक्षण नसले तरी , देवाचे काय काय तोंडपाठ . मी साधारण सात-आठ वर्षांची असल्यापासून पहिले त्यांना . सकाळी उठुन अंघोळ झाली की व्यायाम , मग हरिपाठ म्हणत , गोठ्यात काम करत , साफसफाई आणि म्हशीला चारा घालणे वगैरे . मोठा प्लॉट होता आणि थोड्या जागेतच घर . बाकी जागेत बाग . त्यात बदाम , आंबा , उंबर , लिंब , पेरु असली बरीच झाड होती . यांच्या हातात कायम एक खुर्पी(विळा) , बागेची साफसफाई करणे , तण काढून टाकणे सतत चालू असे . शिवरात्री , आषाढी-कार्तिकी एकादशी अशा खास दिवशी आणि मनात आले , लहर लागली की घरून निघत , ओंकारेश्वर मंदीर , जुने गाव , आमचे घर आणि परत त्यांच्या घरी असे सगळे चालत जात . सगळे जवळ जवळ सात-आठ किलोमीटर तरी असेल आणि हे सगळे वयाची शंभरी पार केल्यांनतर ! कधीच काही आजार नाही , औषध नाहीत . शेवटचे पाच दिवस फक्त पलंगावर आडवे होते . सारखे म्हणत मी सव्वाशे वर्ष जगणार , पण एकशे दहा वर्षांचे अगदी निरोगी आयुष्य जगले !
                                        जनार्दन सुका खडके (आजोबा १९१९-२००४) , एम ए एम एड करून महाराष्ट्रात पहिले आलेले . स्वातंत्र लढ्यात अगदी सक्रीय सहभाग , जेल मध्ये सुद्धा गेलेले काही काळ . असेच एकदा काही कामाने चालत जात असतांना , त्यांची चप्पल तुटली . सोबत पूज्य साने गुरुजी होते , स्वतःची चप्पल त्यांनी आजोबांना दिली आणि स्वतः अनवाणी चालले , असे आपले पूज्य साने गुरुजी ! भारत सरकारने आजोबांना ताम्रपट देऊन गौरविलेले आहे . आधी ट्रेनिंग कॉलेज आणि नंतर काशीबाई विद्यालयाचा मुख्यध्यापक म्हणून भार सांभाळला सेवा निवृत्ती पर्यंत !

©आनंदी पाऊस 
माझा वारसा (व्यक्ती)
जुन २०२०





आमच्या अण्णांना मिळालेला ताम्रपट! 









Comments

  1. Pitaputrachi jodi 🙏
    varnan chan
    Kharach tin tin ajol kevhadi hi shrimanti

    ReplyDelete
    Replies
    1. हो , खरंच खूपच श्रीमंती ! धन्यवाद !

      Delete
  2. खूप छान....
    -सोनल चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  3. Kharech aapan natyanchya babtit khupach shrimant! Tyamule लाड पण खुप व्हायचे. खुप खाऊ पण मिळत असे. खुप छान लेख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय , खूप सारे लाड आणि खूप सारा खाऊ या सारखा दुसरा आनंद नाही या जगात !

      Delete
  4. खुपच छान आहे लेख. तुझ्या कल्पनाशक्तीला खुपच पंख फुटायची आधीपासूनच. खुप मस्त आहे तुझे लेख.हे सगळं तुम्ही बहिण भावंडांनी अनुभवलेले आहे. सौ.मंदा चौधरी. भवलेले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...