Skip to main content

लाडक्या राजांची जोडी(वारसा स्पर्धा)

 लाडक्या राजांची जोडी.

(वारसा स्पर्धा)




                 तर ही जोडी कुणी मानवी राजांची नाही , तर ही जोडी आहे दोन झाडांची , फळांचा राजा आंब्याच्या झाडांची म्हणून राजांची  जोडी ! 
                आमची शेती आमचे मूळ गाव आणि त्याच्या आजूबाजूला विखुरलेली आहे . त्यापैकीच एका शेतात आहे ही जोडी . या फळांचा स्वाद माझ्या आजोबांनीही चाखला आहे म्हणजे उघडच आहे , ही झाड त्याच्या बऱ्याच आधीची असणार . आम्ही मुलं वरचेवर शेतात जात असू , कधी सगळे सोबतच तर कधी एकेकटे , आजी बरोबर किंवा अजून घरातील कोणाही मोठ्या व्यक्ती बरोबर . शेतात उन्हातान्हात भरपूर हुंदडून थकल्यावर छान शांत सावलीची ओढ लागे , तेव्हा ही झाडच आम्हाला त्याच्या विशाल , डेरेदार , थंडगार सावलीत सामावून घेत . असे उन्हातान्हात हुंदडल्यावर या थंडगार सावलीत विसावणे म्हणजे केवळ स्वर्गीय अनुभव , शब्दात वर्णनाच्या पलीकडला !
              हे शेत , ही झाड जरा रस्त्याच्या बाजूला असल्याने बराच आंबा चोरीला जातो . मग उरलेला उतरवून घेतला जातो . आता ही दोन्ही झाड काही खाण्याच्या आंब्याची नाहीत .ही दोन्ही झाड जरा जवळ जवळ तर आहेतच पण त्याचा पसारा इतका मोठा आहे की त्यांच्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या आहेत . तरी  एक अगदी गोड , मधुर आंबा तर दुसरा एकदम आंबट , लोणच्याचा ! तर आंबट आंब्याचे हवे तेव्हढे लोणचं घालून बाकीचा वाटून टाकला जातो . 
              आता मधुर आंबा ! हा उतरवून आणला की घरी या अर्धवट पिकलेल्या आंब्यांची अढी लावली जाते . अढी म्हणजे जमिनीवर वाळलेले गवत पसरावयाचे , त्यावर एक एक आंबा नीट रचून ठेवायचा , त्यावर परत एक थर वाळलेल्या गवताचा घालायचा . खूप जास्त असतील आंबे तर यावर परत एक थर आंब्यांचा आणि वर परत एक गवताचा थर . ही अगदी पूर्वापार पारंपरिक नैसर्गिक पद्धत आंबे पिकविण्याची . 
                रोज ही अढी उघडून बघावी लागते . पिकलेले आणि सडलेले आंबे काढून घ्यायचे आणि बाकी अढी परत जशीच्या तशी लावून ठेवायची . मग आमची चंगळ ! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे प्रत्येक खाणं म्हणजे आंबा ! आणि झोपेत आंब्यांचा मधुर वास , जो कायमच दरवळत असे घरात , आंब्यांचा मौसम संपेपर्यंत ! घरात कायम एक बादली पाण्याने भरलेली आणि त्यात आंबे भिजायला टाकलेले . हवा तेव्हा आंबा घ्यायचा आणि दोन्ही हातांनी चोळून घ्यायचा , वरच आंब्याचं नाकं काढायचे आणि आंब्याचा रस मस्त ओढून ओढून चाखायचा . खाऊन झाल्यावर साल फेकण्यासाठी आणि कोय वाळवण्यासाठी ठेवायची !
पूर्ण धमालच धमाल !!!
               फक्त आता या स्पर्धेच्या निमित्ताने एक लक्षात आले , या आंब्यांचा अगदी जन्मापासून येथेच्छ उपभोग घेतला पण त्या झाडांचे , आंब्यांचे एकदाही फोटो काढले नाहीत . आता या टाळेबंदी मुळे घरातून बाहेर पडून शेतात जाऊन फोटो काढणेही अगदी अशक्य होऊन बसले आहेत .......परीक्षकांनी ही अडचण लक्षात घेऊन , आमच्या या लाडक्या राजांना योग्य तो न्याय द्यावा ही विनंती . 

( झाड विभागातील ही एकमेव प्रवेशिका होती स्पर्धेमध्ये )

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा )
एप्रील २०२०


















Comments

  1. अगं काय दिवस होते ते!!!
    लेख वाचून ते सर्व आठवले. त्या आंब्याच्या शेतात जायला तर किती आवडत होते आपल्याला. आणि आंब्याचा सिझन तर कधी संपुच नये असे वाटत असे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय  शेताचे आपल्याला खूप जास्त आकर्षण !  खरतर  शेतात पाणी सुद्धा खेळायला मिळत नसे . पण बहुतेक आगगाडीने जायला मिळत होते आणि शेतात पोहोचायला रुळांवरून चालायला मिळत होते . त्यामुळे असेल . पण आता विचार केला तर खुप भीती वाटली मला . असो . फार छान आठवण !
      आणि आंब्यांचे तर बोलायलाच नको ..... आपला अगदी आवडता चिकन मधील आंबा !

      Delete
  2. केशव उवाचं
    आंब्याची डाल घेऊनभोवती सर्वांनी बसायचं...डाल संपल्यावर ढेकर देतच उठायचं...
    वीक पाँईंट आहे आपला...
    मे महिन्यात वजन वाढलं तरी चालेल...आंबा पाहिजे...

    ReplyDelete
    Replies
    1. आमच्याकडे म्हणजे बादली भर पाण्यात बुडविलेले आंबे . बसायचे वगैरे नाहीच , चालत फिरत , बागडत आंबे खातच राहायचे अगदी २४X ७..... घरातील आंबे संपेपर्यंत . आणि हल्ली तर अगदी ऑगस्ट पर्यंत खातो आम्ही आंबे ! नीलम च्या मधुर चवीशिवाय मन आणि पोट दोन्हीही भरत नाही  ...... 

      Delete
  3. Sagale lekh wachale mi aaj eksath��... Mast zalet Sarva lekh ani junya aathvani ❤️ khup chan warasa japala aahes and congratulations for certificate��
    Evadhi mothi Aambyachi ani kadunimbachi zade aata pahayalach milat nahit... Ani juni bhandi wah..... Thanks for sharing... Keep writing and posting��

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्या वाचण्याकरिता आणि कौतुका करता एकसाथ सगळे आणि खूप सारे धन्यवाद !

      Delete
  4. Khup chhan ..aatasha ase pikawalele aambe durmilach..sarw carbide me pikawalele astat..mhanunch June te some mhanyche..

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय , आताशा फक्त या नैसर्गिक , मधुर आठवणी फक्त ! असो काळाप्रमाणे बदलत राहाण्याशिवाय काही पर्याय नाही . धन्यवाद !

      Delete
  5. Kharach gavarani aambe tyachi yadhi mazha mahercha gavakadil mala athavali ya lekhacha nimmitane
    khoop maja yaichi sagale aambe sampe paraiyt anandi anad, kai tyachi chav, sughandh ahaha
    Badhalibhar aambe lagech sampaiche
    Ek nahi don nahi ter ekavelela 10,12 aambe sahajach khallele jat

    ReplyDelete
    Replies
    1. भुतकाळ , गावराणी आंबे आणि आपले बालपण !!! यातील कशालाच पर्याय नाही ! फक्त आठवणी आहेत छान , काही काळ रमायला ! आणि त्यातुन सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे चालायला . 

      Delete
  6. हा आठवणी चा लेख आहे खरोखरच आंबा खुपच गोड आणि रसाळ आहे त्या राजा ची जोडीने खुप छान सावलीही देत आहे
    मंदा.चौधरी

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , आपल्याला आणि चोरांना सुद्धा पोटभर आंबे आणि आभाळभर सावली देणारा ! 

      Delete
  7. लीला वानखेडेSeptember 11, 2020 5:00 pm

    लाडका राजाची झाडांची जोडी तर खूपच डेरेदार सुंदर आणि आंब्याची आढी झालेली बघून असं वाटतं की आंबे खायची तयारी करावी��

    ReplyDelete
    Replies
    1. वावा ही खरी पावती!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  8. Apratim lekh...gavrani ambe baghun mala lahanapn atahwele....kai sunder diwas hote te....

    ReplyDelete
  9. वा छान आंबा म्हनाल तर ोतोंडाला पाणी सुटते लहान पणी मे महीना म्हनजे खुपच मजा आंबे उतरायला गाडी बैल घेउन झाडाखाली जाणे काय त्या आठवनी मजा आली वाचुन परत शेतात गेल्या सारख वाटल त

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच खरंच ! आठवणी , गोड आठवणी , रसाळ आठवणी , मधुर आठवणी ! अगदी समुद्र , कायम त्यातच डुंबून राहावेसे वाटते !! सप्रेम धन्यवाद !

      Delete
  10. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  11. आंबे तुझं वाचून.....
    आंब्याच्या मधुर रसाळ गराप्रमाणे लेख गोड झालाय
    लेख वाचून, या मौसमातही आमरस खावासा वाटतोय..

    ReplyDelete
    Replies
    1. लेखापेक्षा तुझा अभिप्राय जास्त रसाळ आणि मधुर आहे ! खुप सारे प्रेम !!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...