Skip to main content

वारसा स्पर्धेच्या निमित्ताने (वारसा स्पर्धा)

 वारसा स्पर्धेच्या निमित्ताने 



                                   या वर्षातील खुप जास्त आणि  वारंवार वापरले जाणारे शब्द म्हणजे 'कोव्हीड-१९' , 'करोना' , 'टाळेबंदी' . आणि यामुळे घरादारातच नाही तर संपुर्ण जगभरातच एक भयानक नकारात्मकता पसरली आहे . अगदी प्रत्येकाची दैनंदिनी पार बदलुन गेलीये . पण या सगळ्या वाईट परिस्थितीत आणि नकारात्मकते मध्ये सुद्धा खुप सकारात्मक गोष्टी घडत आहेत . या सगळ्या गोष्टीबद्दल नंतर सविस्तर लिहिनच . आत्ता फक्त या एका सकारात्मक गोष्टीबद्दल . 
                                   ती म्हणजे वारसा स्पर्धा ! इंटॅक संस्थेचे भारतभर वेगवेगळे विभाग आहेत . हे सगळे विभाग सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असतात . या कठीण काळात सुद्धा अनेक कार्यक्रम राबविणे सुरूच आहे , या संस्थेचे . अगदी भरभरून माहिती , ज्ञान  मिळते आहे . त्यापैकी सोलापुर विभागाने सुद्धा या काळात एक छान आणि स्त्युत्य कार्यक्रम राबवला . तो म्हणजे ही "वारसा स्पर्धा" ! या स्पर्धेच्या दोन फेऱ्या झाल्या . या दोनही फेऱ्यांमध्ये मी भाग घेतला होता . यात सगळ्या मिळुन मी अकरा प्रवेशिका पाठविल्या होत्या . तर या सगळ्या प्रवेशिका फक्त स्पर्धेच्या प्रवेशिका , नाहीत तर या सगळ्या दस्तावेजीकरणाच्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे . 
                                  पहिल्या एक दोन प्रवेशिका पाठविल्यानंतर माझे मलाच जाणवले , या स्पर्धेच्या निमित्ताने माझ्याच वारस्याशी , माझी नव्याने आणि खुप वेगळ्या आणि महत्वाच्या दृष्टीकोनातून ओळख झाली . आणि त्या खुपच वेगळ्या दिसल्या , भासल्या . त्या किती महत्वाच्या आहेत याची जाणीव झाली . एरव्ही मला ही जाणीव झाली नसती , त्या दृष्टीने . आणि मग वाटून गेले बक्षीस मिळणे वगैरे फार महत्वाचे नाही . पण या निमित्ताने ही एक वेगळी जाणीव आणि दृष्टी मिळाली आहे . त्यामुळे शक्य तितक्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होईल , कायमचे . पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्यांची ओळख होत राहील आणि माहीती मिळेल . 
                                 मग मी शक्य तितक्या गोष्टींचे दस्तावेजीकरण अगदी झपाटून टाकल्या सारखे केले . तेव्हढ्यावरच न थांबता पुढेही केले आणि करत राहण्याचा मानस आहे . चौधरी सदनाच्या दस्तावेजीकरणासोबत , हे ही सगळे दस्तावेजीकरण या स्पर्धेच्या निमित्ताने सुरु झाले आहे . यातील कित्तेक गोष्टी नामशेष झाल्या आहेत , होण्याच्या मार्गावर आहेत . तर या सगळ्या बद्दलचे लिखाण आणि छायाचित्र सुद्धा  या ब्लॉग च्या माध्यमातुन वाचायला उपलब्ध करून देत आहे . स्पर्धेत शब्दांची मर्यादा होती , त्यामुळे तितक्याच शब्दांत विषय लिहावा लागलेला आहे . तसेच त्यात वारसा मुल्यांवर जास्त भर आहे . पण काही गोष्टींचे ब्लॉग मध्ये इतर ठिकाणी उल्लेख आलेले आहेत किंवा पुढेही येत राहतील . त्या ठिकाणी मात्र त्याची बाकी माहिती सुद्धा नक्कीच मिळेल . 
                               इंटॅक संस्थेच्या सोलापुर विभागाचे खुप खुप मनःपुर्वक आभार ! माझ्याच वारस्याची माझ्याशी अशी छान ओळख करून दिल्याबद्दल . या पुढेही अश्याच छान छान उपक्रमांचे आयोजन होत राहील अशी आशा करते आणि शुभेच्छाही देते ! 

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा)
१ सप्टेंबर २०२०











Comments

  1. Ho aplya traditional goshti,
    forts ,
    Food
    Wear etc ha sgla warsa pudhil pidhila kalala pahije��
    Stutya upkram��
    ������ ho g mujorpana nvta bai

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरय अगदी!
      खुप सारे धन्यवाद 😍

      Delete
  2. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद �� ☺

      Delete
  3. Manjusha ChaudhariSeptember 04, 2020 2:23 pm

    Mast vishay ahe ani subak ritine mandnyat tuza hatkhanda ahe

    ReplyDelete
    Replies
    1. तुझा कौतुक करण्यात चांगलाच हातखंडा आहे!
      सप्रेम धन्यवाद 😍

      Delete
  4. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  5. युगे युगे भावनांचे धागे
    जपावया मन तुझं लागे...
    Artifacts, space,people and expressions and happiness doccumentation ... Through Time..

    ReplyDelete
    Replies
    1. वावा माझ्या लेखनापेक्षा तुझा अभिप्राय जास्त छान आहे!
      Thnks a tons 😍

      Delete
  6. Chan upkram aahe
    Tula khup khup Shubhechha!!

    ReplyDelete
    Replies
    1. तुला खुप खुप धन्यवाद अणि प्रेम 😍!! ❤

      Delete
  7. Yekatra ktumbat rahyane sarvache sukh dukh samjun gheta yetat madat karne kalaji ghene he sarvach chan. Vadhi che varanan pan khup mast pangatit basun tyatun tup ghenyacha aanand ghetla aahe
    Aai kade pan baryach vadya aahet pan aata bicharya adagadit padalya ahet ....

    ReplyDelete
    Replies
    1. खरय पंगत मध्ये बसुन वाढी मधुन तुप वाढून घेण्याचा आनंद काही औरच असतो 😍
      छान आठवण करून दिलीस
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...