Skip to main content

हरतालिका (घरातील गमती जमती)



हरतालिका 
(घरातील गमती जमती)



                             गच्चीवरच्या लेखांची सुरवात कोजागिरी - गुलाबाई म्हणजे शंकर-पार्वतीच्या उत्सवाने झाली आणि आता घरातील लेखांची सुरुवात सुद्धा हरतालिका म्हणजे शंकर पार्वतीच्या व्रताने सुरुवात झालीये . केवळ योगायोग , ठरवून असे काही नाही . गॅलरीतील लेख लिहून झाले आणि पहिला लेख लिहायची वेळ आली आणि हरतालिका - गणपती तोंडावर आलेले मग वाटले हरतालिकेनेच सुरुवात करावी ! 
                            हरतालिकेच्या पूजेच्या तयारीची सुरुवात ४-५ दिवस आधीच होत असे . सगळ्यात महत्वाचे आणि पहिले काम , ते म्हणजे गुरुजींकडे जाऊन सकाळी लवकरची वेळ ठरवून येणे . कारण त्या दिवशी त्यांना खूप घरी जाऊन पूजा सांगायची असे . पण आमचे गुरुजी ठरलेले आणि पूजेची साधारण वेळ सुद्धा . या गुरुजींच्या जवळ जवळ तीन पिढ्यांनी आमच्याकडे वेळोवेळी येऊन सगळ्या प्रकारच्या पूजा, अगदी लग्न कार्यापर्यंत सगळे पार पाडले . अगदी आमच्या लग्नाचे विधी सुद्धा यांच्याच पुढच्या पिढीने पार पाडलेत . आता मात्र बदललेत गुरुजी आमच्या घरचे . तर सगळे साधारण ठरलेले असे, पण तरी वेळेवर गोंधळ नको म्हणून चार-पाच दिवस आधीच त्यांच्याकडे जाऊन त्यांना आमंत्रण वजा आठवण करून दिली जात असे . चौधरी सदनापासून अगदी शंभर मीटर वर त्यांचे घर होते . 
                             दुसरे महत्वाचे म्हणजे 'फुलपत्री' . दोन दिवस आधीपासून फुलपत्री गोळा करण्याचे काम चालू होई . ज्यांच्याकडे या पूजेला लागणारी फुलपत्री असे त्यांना आधीच सांगितलेले असे , आम्ही येऊन तोडून घेऊन जाऊ . थोडक्यात आरक्षण सगळ्या गोष्टींचे ! मग मम्मी लोक आणि त्यांच्या बरोबर आम्ही मुली , दोन दिवस आधी पासून सगळीकडे फिरून ही फुलपत्री गोळा करून आणत असू . सगळ्यात महत्वाचे म्हणजे बेलाची पानं आणि पांढरी फुल , शंकराला अती प्रिय असणारी . या बरोबरच गोकर्णाचे निळे फुल सुद्धा शंकराला अतिप्रिय . का? याचे उत्तर आजतागायत माहिती नाही मला . बेलाची पानं सुद्धा तीन एकत्र असलेलीच आणि नशीब फारच चांगले असले तर पाच पानांचे सुद्धा मिळे बेल , कोण आनंद होत असे मग त्याचा ! मग बाकी दुर्वा आणि इतर बऱ्याच प्रकारची पत्री म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पानं सुद्धा लागत . हे काम फार आधी करता येत नसे , कारण घरात फ्रीझ नसल्याने ही फुलपत्री पूजेच्या दिवसापर्यंत टिकवणे फार कठीण . बरं आदल्या दिवशी गेलो बाजारात आणि आणली असेही करता येत नसे , कारण आजच्या सारखी फुलं बाजारात विकत मिळत नसतं . मग दोन दिवस आधीपासून हे काम चाले आणि ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवून ही फुलपत्री टिकवली जात असे . 
                               पूजा करतांना वहायला फुल लागतंच . पण बाकी सजावटीचा भाग म्हणूनही बरीच फुलं लागतं . ही पूजा म्हणजे खोलीच्या मध्यभागी चौरंग ठेवला जात असे . त्यावर पूजा मांडली जात असे . मग या चौरंगाला चार कोपऱ्यांना बांधायला चार केळीचे खांब , चारही बाजुंनी गुंडाळून बांधता येईल असे आंब्याच्या पानांचे तोरण आणि सगळ्यात छान आणि माझ्या आवडीचा भाग म्हणजे येऊ मोठ्ठा हार तयार केला जाई , साधारण सात-आठ फुट लांबीचा . त्याच्या एका टोकाला जास्वदींचे फुल किंवा फुलं आणि दुसऱ्या टोकाला थोडा लांब दोरा सोडला जाई . हा दोरा असलेले टोक छताला बांधले जात असे , जेणे करून तो हार खाली मोकळा सोडला की  ते जास्वदींचे फुल त्या पूजेच्या चौरंगाच्या बरोब्बर मध्यभागी येई . साधारणपणे हा हार चांदणीच्या फुलांचा फरगच्चं हार असे आणि खाली ही लालभडक फुल . फारच सुंदर दिसत असे ते सगळे . हा हार तयार करायला घेतल्यापासूनच मला फार भारी वाटत असे . पण दुसऱ्या दिवशी पूजा आवरली जाई आणि हा हार सुद्धा काढून टाकला जाई , फारच वाईट वाटे मला तेव्हा . काढूच नये असे वाटे , जे अगदीच अशक्य असे आणि दुसरे म्हणजे ती सगळी फुलं सुकून जायला सुद्धा  सुरुवात झालेली असे . तसेच पूजेसाठी प्रत्येकीचे ताट तयार करावे लागे , आदल्या दिवशी रात्री . या ताटात ,हळद , कुंकू , अक्षता , फुल-पत्री सगळ्या प्रकारची आणि कापसाची घरी बनवलेली वस्त्र . ही वस्त्र करतांना आणि तयार झाल्यावर बघण्यात  मला खूप आनंद मिळे , अगदी बघतच राहावेसे वाटे त्याकडे . 
                                आणि तिसरा महत्वाचं काम म्हणजे आजूबाजूच्या ज्या कुणी बायका पूजेला येत असतं ,आदल्या दिवशी संध्याकाळी त्या सगळ्यांच्या घरी जाऊन पूजेची वेळ म्हणजे गुरुजी येण्याची वेळ सांगून यावी लागत असे . जेणे करून त्या सगळ्या दुसऱ्या दिवशी पूजेला वेळेवर येत . हे काम आम्हा मुलींचंच , कारण चौधरी सदनच्या आजुबाजुच्याच सगळ्या बायका येत , त्यांच्या घरी आम्ही एकट्या जाऊन वेळ सांगून येऊ शकत असू . 
                               मग पूजेचा दिवस ! कोण लगबग चाले त्यादिवशी पहाटे पासूनच लवकर उठण्यापासूनच . मी स्वतः त्यावेळी फार लहान होते , त्यामुळे तेव्हा मी पूजा आणि उपवास करण्याचा प्रश्नच येत नव्हता . पण आजतागायत मी ही पूजा आणि हा उपवास कधीही केलेला नाही . मग पूजा करणाऱ्या बायकांच्या अंघोळी त्याही न्हाऊन आणि घरातील बाकी काम आटोपण्याची घाई . पुरुषांची सगळी काम करून देऊन त्यांना मार्गी लावणे . मग या सगळ्या त्या दिवशी छान ठेवणीतील साड्या-पातळ नेसतं , दागिने घालतं , केसांत छान गजरे किंवा फुलं माळत मिळेल त्याप्रमाणे . फारच छान,प्रसन्न आणि उत्साही वाटे त्यादिवशी . मग हळूहळू एक एक करून सगळ्या बायका ही येऊ लागत, त्याही अशाच छान तयार होऊन आणि हातात पूजेची ताटं घेऊन !
                               मग गुरुजीही येऊन दाखल होत आणि ते पूजेच्या तयारीला लागत . त्यात माझ्या सगळ्यात आवडीचा भाग असे . मी तर वाटच बघत असे ते येण्याची . त्यांना थोडी ओली वाळू लागत असे . ही आधीच तयार ठेवली जात असे . मग ते या ओल्या वाळूपासून चौरंगावर छान शिवलिंग आणि बाकी देवता साकारत . काय भारी वाटे ते सगळे तयार करत असतांना आणि तयार झाल्यावर सुद्धा . मी ते सगळं तिथेच थांबून बघत असे . कारण थोडा वेळात पूजा सुरु झाली की हे सगळं पूर्ण झाकून जात असे , त्यावर वाहिलेल्या फुलपत्रीने  आणि काही सुद्धा दिसणे केवळ अशक्य . दुसऱ्या दिवशी म्हणावे तर ते सगळे अस्ताव्यस्त झालेले असे . दोन कारणांनी , एक तर पूजेच्या वेळी झालेल्या फुलपात्रीच्या माऱ्यामुळे आणि दुसरे म्हणजे ती वाळू पार कोरडी झाल्याने एकमेकांना चिकटलेले वाळूचे कण एकमेकांपासून सुटे होऊन गेलेले असतं . 
                              अशी ही सगळी पूजेची मांडामांड सुरु असे , कितीही तयारी करून ठेवली तरी हे राहिले , ते राहिले चालूच असे . कुणातरी एकजणला  गुरुजींसोबत थांबावंच लागे , त्यांना जे जे हवे ते ते द्यायला . एकदा का पूजेची मांडामांड पूर्ण झाली की मग गुरुजींची घाई चाले पूजा सुरु करण्यासाठी . पण दरवर्षी कुणा ना कुणाला उशीर झालेलाच असे . मग गुरुजींच्या विनवण्या . थांबा थोडा वेळ अमकी यायची बाकी आहे वगैरे वगैरे . मग आलेल्या सगळ्या बायका बसून घेत . त्यांना बसण्यासाठी चारही भिंतींना लागून सतरंज्या घातलेल्या असतं  आणि मध्यभागी ही पूजा मांडलेली असे . मग पूजा चालू होई, जवळ जवळ तास दीड तास चाले ही पूजा . आम्ही मुली जरा बाजूला बसून ही पूजा बघत असू . पूजा सुरु असतानाही काय-काय लागतच असे . मग आम्ही पळापळ करून आणून देत असू . 
                               अशी ही सगळी पूजा जवळ जवळ तास दीड तास चालत असे . मग पूजा झाली की गुरुजी सगळ्यांना उखाणे घेण्यास सांगत . मग सगळ्या एकमेकींना आग्रह करत-करत हळू-हळू करत एक-एक जणी उखाणे घेत . मग  सगळ्या पाणी पिणार आणि एकीकडे चहाची तयारी चालू असे तर दुसरीकडे गुरुजींसाठी दुधाची . आता सगळ्याजणी जरा निवांत झालेल्या असत पूजा मनासारखी झाल्याने , पण गुरुजी घाईत , कारण त्यांना पुढच्या घरी जायचे असे पूजेसाठी . मग ते लगेच दूध पिऊन पळत पुढच्या घरी . 
                                मग या सगळ्या बायकांचे चहा-पाणी चाले जाम गोंधळ,बडबड, गप्पा , धांदल असं सगळं एकत्र चाललेलं असे  . सगळं घर अगदी वेगवेगळ्या आवाजांनी भरून जात असे . मला तर फार छान वाटत असे , या सगळ्याजणींना असे छान तयार झालेले , हसत खेळत गप्पा मारत , आपापली आज सकाळी कशी धांदल उडाली ते सांगत बघतांना . मग यांचे चहा पाणी उरकले की , घराच्या मागच्या बाजूचा रस्ता ओलांडून गेले की समोरच एक महादेवाचे मंदीर होते . खर म्हणजे हे मंदीर अजुनी आहे , पण ते आता गणपती मंदीर झालेय . असो तर छोटेसेच पण छान मंदीर ! जराही बडेजाव नाही की तामझाम नाही . छान छोटासा पांढरा शुभ्र नंदी आणि तशीच पांढरी शुभ्र महादेवाची पिंड !  त्या पिंडीला तांब्याचे नागाचे वेटोळे आणि वर टांगलेले तांब्याचेच अभिषेक पात्र . फार छान वाटे तिथे गेल्यावर , प्रसन्न ! आजच्या दिवशी मात्र गर्दी असे तिथे , सगळ्याच बायका येत ना मंदीरात, अशाच छान तयार होऊन आणि छान प्रसन्न चेहऱ्याने !
                                  एक मला जरा न आवडणारी म्हणण्यापेक्षा भीती वाटणारी एक गोष्ट होती . ती म्हणजे एक साधू बाबा कायमचे इथे बसलेले असतं . केस आणि दाढी मोठ्ठी वाढलेली , कपाळावर आणि अंगावर सर्वत्र भस्म माखलेले . खूप भीती वाटे मला त्यांची .आणि बाहेरही कुठे दिसले तर त्यांचीही . खरे सांगायचे तर अजूनही वाटते . मध्यंतरी चंद्रमोहन सरांनी बरेच साधू साकारले त्यांच्या चित्रांमधून , तेव्हापासून चित्रातल्या साधूंची भीती बरीचशी कमी झालीय . 
                                   आजचा दिवस म्हणजे उपवासाचा दिवस . अगदी मीठ सुद्धा खात नसतं त्या दिवशी उपवास करणारी मंडळी . मग त्या साबुदाण्याची गोड खिचडी किंवा खीर करून खात . साबुदाण्याची गोड खिचडी ही संकल्पनाच माझ्या गळी आजतागायत उतरली नाहीये . तिचा वास सुद्धा मला आवडत नसे , खाणे तर फारच लांबची गोष्ट . आजतागायत मी ती चाखून सुद्धा पहिली नाहीये . पण एक मात्र खूप आवडती गोष्ट घरी येत असे हमखास . उपवास म्हणजे फळं हवीतच . या काळातच साधारण सफरचंदाचा हंगाम सुरु होतो . मग या हंगामाची पहिली सफरचंद आज घरी येत . त्यातल्या त्यात ती छोटी छोटी गुलाबी आणि मस्त आंबट गोड चव आणि रवाळ असणारी . खायला तर छानच पण दिवसायालाही काय गोड दिसतात छोटी-छोटी गुलाबी रंगाची !
                                 संध्याकाळी आरती होत असे . मग परत शक्य तितक्या सगळ्याजणी येत , संध्याकाळच्या आरतीला सुद्धा . मग थोड्या फार चर्चा होत रात्रीच्या जागरण आणि खेळांबद्दल . पण हे कधीच झाले नाही . 
                                     मग दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा . त्यासाठी गुरुजी परत येत .  मगच पूजा आवरली जात असे . गुरुजींना शिधा दिली जात असे . एका सुपात काढून ठेवलेली असे . जसे कणिक , तांदूळ , डाळ , गूळ , साखर , तेल , तूप , आणि सोबत थोडे पैसे , मला वाटते अकरा रुपये सुद्धा नसतील कदाचित . मग पूजा आवरून सगळे स्वच्छ केले की काही काळ जरा मनात वाईट वाटतं असे . पण लगेच बाप्पा येत आणि त्या उत्सवाने घर परत आनंदाने भरून जात असे ......!!!!

©आनंदी पाऊस 
घरातील गमती जमती 
१ सप्टेंबर २०१९










दुर्वा 


निळे गोकर्णाचे फुल 


पांढरे गोकर्णाचे फुल 


लाल जास्वदींचे फुल 


चांदणीची फुलं 



तुळशी पत्र आणि मंजिऱ्या 



बिल्व पत्र -तीन दलांचे 


बिल्व पत्र आणि फळं  



कापसाचे वस्त्र 


आमचे गुरुजी 



पुजेची तयारी 


चौरंगावर मांडलेले वाळुचे शिवलींग 


पुजा झाल्यावर फुलं पत्रीने 
झाकुन गेलेली पुजा 


हेच ते मंदीर मागच्या बाजूच्या 
मुख्य रस्त्यावरील 
पूर्वी महादेव मंदीर होते 
आता गणपती मंदीर आहे 


मंदिरातील बाप्पा १



मंदीरातील बाप्पा २



Comments

  1. Replies
    1. सप्रेम धन्यवाद ! 🙏😇

      Delete
    2. ताई खूपच छान लेख खूप आवडला
      नेहमी प्रमाणेच सुंदर लेखन👌👌🙋

      Delete
  2. सुंदर वर्णन... सोबतच्या फोटो मुळे आणखी छान झालाय लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. पुश , मनःपूर्वक धन्यवाद !😍🤩😇

      Delete
  3. शैलजा चौधरीMarch 13, 2020 5:22 pm

    खूप छान!

    ReplyDelete
    Replies
    1. काकू , सप्रेम धन्यवाद !🙏🥰

      Delete
  4. Chan varnan tey jaswandache phool madhomadh chaurangavar sodalele 👌
    Hubehub varnan’👍

    ReplyDelete
    Replies
    1. नेमका मुद्धा नमूद करतेस . मला मनापासून आवडलेला . खूप सारे धन्यवाद !😍💖

      Delete
  5. Navapramanech mangalamay ani prasanna lekh😊👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !😍 कोण आपण ?

      Delete
  6. निलिमा झोपेMarch 13, 2020 8:40 pm

    wa sunder mahiti hartalikechi vachun aamchya pan lahanpanichya aathavani jagya zalyat
    khup chan

    ReplyDelete
    Replies
    1. या लिखाणातून मला  बालपण परत जगण्याची संधी मिळालीच आहे ,  प्रत्येक वाचकाला सुद्धा काही क्षण का होईना बालपणात रमता येते आणि तो आनंद परत अनुभवता येतो😇🤩 . तुझ्या आठवणी पण शेअर करत जा थोडक्यात आमच्या बरोबर ..... धन्यवाद !🙏

      Delete
  7. जयंत पाटीलMarch 13, 2020 8:41 pm

    छान झाला आहे लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. नाना , मनःपूर्वक धन्यवाद ! तुमचा अभिप्राय हवाच🙏🙏😇

      Delete
  8. डॉ माया पाटीलMarch 13, 2020 8:42 pm

    वा वा खूप छान लिहिता तुम्ही. अगदी डोळ्यासमोर खरा प्रसंग आणि पूजा उभारली...

    ReplyDelete
    Replies
    1. मॅम , सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏🙏 . वेळात वेळ काढून लेख वाचून अभिप्राय देऊन इतके सारे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद !😇😍

      Delete
  9. सीमंतिनीMarch 13, 2020 9:12 pm

    मस्त.. आमच्याकडे आजोबाच पूजा सांगत. आणि मुख्य म्हणजे त्यादिवशी त्यांचा वाढदिवस असे. घरी आजी, आई, आत्या आणि आम्ही बहिणी अशी बायकांची मेजाॅरिटी त्यामुळे त्यादिवशी पुरूषांचा स्वयंपाक साधाच केला जाई, त्याचे आजीला आणि आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटे. पण श्रीखंड किंवा सुधारस असं सोपं आणि सगळे खाऊ शकतील असं पक्वान्र नेहेमी असे.

    आजही मी पूजा उपवास करते तेव्हा आण्णा आजोबांची सौम्य हसरी मूर्ती शाल पांघरून पूजा सांगताना डोळ्यांसमोर येते..

    ReplyDelete
    Replies
    1. किती सुंदर योगायोग आणि किती सुंदर आठवण😍😇 ! खूप धन्यवाद ही छान आठवण शेअर केल्याबद्दल !

      Delete
  10. मंदा चौधरीMarch 13, 2020 9:15 pm

    बहुत खुप मस्त लिहिले आहे खुप छान

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या सगळ्यांच्या उत्साहाला कायम सलाम माझा🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️ ! त्याचा काही अंश तरी माझ्यात आहे याचा मला खूपच आनंद आहे !!!😇😍🥰

      Delete
  11. स्मिता चौधरी खडकेMarch 13, 2020 9:17 pm

    Mast lihilay akka
    Mala gandhi nagar chya pooja athavat
    Fruit salad pan vhyaych na poojenantar

    ReplyDelete
    Replies
    1. छान वाटले तुला इथे भेटून🥰 ! फ्रुट सलाड बऱ्याच नंतर नंतर सुरु झाले , किंबहुना मी तर म्हणतेय की हे मला आठवतच नाही . कदाचित मी वसतिगृहात राहायला गेल्यानंतर सुरु झाले असावे😔 . फ्रुट सलाड म्हणजे मला फक्त तुझ्या वाढदिवसाचेच आठवते😉 !

      Delete
    2. हो गांधी नगर मध्ये आपण एक तर पपई आणि दुध किंवा फ्रुट सलाड करायचो व खायचो

      Delete
    3. हा हा हा.... दिवस उपवासाचा अणि गप्पा चालु आहे खादाडपणा बद्दल 😁😂😇

      Delete
  12. भूमिका चौधरीMarch 13, 2020 9:20 pm

    Mi pan hi maja anubhavliy pan Gandhi Nagar madhe
    Khup majja yaychi
    Aka varshi mi mummy naval khup hatt karun upwas kela pan mummy ne ukadlelya batatyachi bhaji banavli babansathi mag n rahun mi to upwas sodun takla duparchya jewnachya velich��

    ReplyDelete
    Replies
    1. बहुतेक लहानपणी प्रत्येकाची उपवासाची अशीच एक तरी आठवण असतेच😉 . माझीही आहेच😆 , ती नंतर कधीतरी सांगीनच . तुझी आठवण सांगितल्याबद्दल धन्यवाद😄😄!

      Delete
  13. मालती चौधरीMarch 13, 2020 9:21 pm

    Khupch Chan��������lihile aahe

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही सगळया काय काय असे छान छान घरात करत होता🤩 , त्यामुळेच मला हे सगळे लिहिण्याची संधी मिळालीय🥰😇 , तर खूप सारे मनःपूर्वक , सप्रेम धन्यवाद ❤!

      Delete
  14. Nanda wagle

    Hartalika pujeche warnan khoop sunder lihile aahe te doliyasamor shabda citra ubhe rahete
    Pics khòop sunder mast
    Aasech maze mahire shrawan friday pujancha aanand mi lahanpani ghetla aahe
    Aai kakunsathi puj esathi
    Phule patri durwa gola karne aamhi ek weglech energine karat aasu

    Àll the best likhan chalu rahu de

    ReplyDelete
    Replies
    1. काकू , तुमचा अभिप्राय आणि आठवणी वाचायला फारच आवडते मला😇 , सगळ्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏 !

      Delete
  15. किशोरी मातेकरMarch 14, 2020 9:11 am

    Wa wa bharich

    ReplyDelete
  16. मस्त वर्णन आहे. तुझी लेखनशैली इतकी descriptive आहे की डोळ्यासमोर ते सगळं वर्णन अगदी तंतोतंत उभं राहतं. पूजेची पूर्वतयारी आणी एकंदरीत सगळ्या पूजेला तुम्हा सगळ्यांचा वावर अणि सहभाग sagla हा ब्लॉग वाचताना मूर्तिमंत डोळ्यासमोर येतं. बारीक सारीक घटना अणि त्यांचे detailing हे sagla आठवून शब्दांकित करण्याची तुझी कला खरच थक्क करणारी आहे. एकंदरीत तू mention केल्याप्रमाणे, पुरुष मंडळींचा सहभाग या पूजेत बिलकुल नसतो. त्यामुळे आम्हा पुरुषांना पण तुझ्या ब्लॉग मुळे sagla हा उत्साह अनुभवता आला. पाच पानाचं बिल्वपत्र मी पण पहिल्यांदाच बघितलं. Nice write up, keep it up...... 👍👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. अशा छान आणि सविस्तर अभिप्रायाबद्दल अगदी मनःपूर्वक धन्यवाद सर🙏 ! पण आज पर्यंत पाच दलाचे बिल्वपत्र पहिले नाही याचे फारच आश्चर्य वाटले मला . अर्थातच  सहजासहजी उपलब्ध नसतेच , त्यासाठी नशीबच असावे लागते😇 . पण भारीच आनंद होतो ते मिळाले म्हणजे !🤩😍

      Delete
  17. अरुण झोपेMarch 16, 2020 6:57 pm

    Read the entire column. The description is simply Live. All your writings deserve to be published as a book. So excellent......Arun mama.

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏🙏 इतके सारे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद !😇😍

      Delete
  18. Khup sundar lihilay... Junya Aathvani jagya zalya vachun

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !😇😍

      Delete
  19. एल झेड कोल्हेApril 09, 2020 4:01 pm

    खूप छान लिहिले आहेस. पण आईने घेतलेला उखाणा आठवला नाही का? भरजरी वस्त्र परिधान करून बायकांचे नखरे वर्णन करायला हवे होते का?

    ReplyDelete
    Replies
    1. आमच्या घरातील एक सगळ्यांचा आवडता  वेळेला धावून  उखाणा चांगलाच लक्षात माझ्या , कारण निमित्त काहीही असो , त्या त्या निमित्ताला उपयोगी पडत असे . "हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी , ..... रावांचं नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी " जो दिवस असेल तो मध्ये घालायचा की झालं😆 ! त्या काळात नखरा हा प्रकार अजिबात नव्हता सगळे कसे भाबडेपण आणि निरागस ! छान प्रश्न/शंका विचारलात😀 . धन्यवाद !😇🙏

      Delete
  20. प्राजक्ताAugust 21, 2020 4:22 pm

    हरतालिका पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा lekh apratim thanks for or sharing today

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 अणि मनापासून स्वागत!! 😇😊

      Delete
  21. Khup chan

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  22. Haratalikecha lekh yekadam zakas puchechi mahiti v sarv goshti agadi chan lihilya aahes kalch hartalia v tuza lekh vachun changle vatale
    Photos pan sunder v puchechi mandani pan mast

    ReplyDelete
    Replies
    1. 😍😇मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  23. स्वाती प्रभुणेAugust 22, 2020 1:03 pm

    मस्त मला पण आठवले पूर्वी एकत्र येऊनएका घरीच पूजा करत पत्री फुल व ते वातावरण पूर्वी अशी समजूत होती अविवाहित मुलींनी ही पूजा करावी म्हणजे पती छान कर्तृत्ववान मिळतो वाळू पासून महादेव पिंड करत व दुसऱ्या दिवशी ते सर्व नदीत विसर्जन करत
    हळूहळू काळा प्रमाणे सर्वच बदलत आहे त्या निमित्ताने सर्व एकत्र येत गप्पां रंगत
    आता तर करोना मुळे आपल्या कडे अमेरिकेत असते असे व्हायला लागले आहे. It व इतर गोष्टींन मुळे तर हळूहळू सर्वच एकमेकांन पासून लांब जात आहेत पुढची पिढी खूप प्रॅक्टिकल होत आहे व 99℅अमेरिकेत जात आहे

    ReplyDelete
  24. खरय काळाप्रमाणे सगळे बदलत आहे....
    त्यात करोना चा गोंधळ ....
    😃 मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  25. स्वाती चौधरीAugust 25, 2020 4:53 pm

    हरतालिका घरातील गमती जमती खूप मस्त
    पूजा झाल्यावर मंदा ताई बेलाचे पान खाऊ घालायची

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वा ! खरंच की , मी तर विसरूनच गेले होते ही गोष्ट . खूप खूप मनःपुर्वक धन्यवाद , ही आठवण सांगितल्या बद्दल माउली !

      Delete
  26. Hartalika varatmadt varan

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 काकु! ❤ 😇

      Delete
  27. पुजेचा प्रसंग व तयारी खुप मांगल्यपूर्ण वर्णिले आहे जो अगदीं डोळ्यासमोर अलगद हुबेहूब उभा राहतो.
    पूजेची ५ फळे माला ‌अवगत आहेत..पण ५ पानांची बील्व पत्रे पहिल्यांदाच पाहिलेली😍🙏.
    with refrence to mythology महादेवा used to stay in forest..बैरागी lifestyle kind..so used to offer unprocessed offerings like milk,flowers all type.of pulses n rice.(कच्च कच्च)
    असो...प्रकाश चित्रें मस्तच ..आणि हो..फुलपत्रानी झाकलेली पुजा मालाही फार आवडते.


    ReplyDelete
    Replies
    1. Excellent अभिप्राय!!
      Always out of the box!!!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫 💐 💐 💐

      Delete
  28. सुचिता कामतSeptember 28, 2021 6:49 pm

    Thanks, खूप छान माहिती मिळाली. माझी आई हे व्रत करत नसे त्या मुळे मी पण एकदाच उपवास केला होता. तुम्ही केलेलं वर्णन वाचत असताना संपूर्ण दृश्य समोर दिसत होत. धन्यवाद ��❤️ खूप छान माहिती दिल्याबद्दल ��

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  29. मस्त वर्णन.
    मला आमच्या वाड्यातील पूजा आठवली.माझ्या माहेरी महानुभावपंथीय असल्याने मला आई कधीच उपवस व पूजा करू देत नसे पण काॅलेजमधे जायला लागल्यापासून हट्टाने मी पूजा करू लागले .आता जरी भुसावळ कॅालेजच्या बरेच पुढे पसरले असले तरी त्यावेळेस कॅालेजच गावाबाहेरच होते , त्यामुळे तेथे जाईपर्यंत रानच हेाते त्यामुळे आम्ही तेथूनच वेगवेगळी पत्री, फुले आणत असू. रात्री जागरण करतांना मजा येई.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छानच आठवणी! ईथे सांगितल्या बद्दल खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  30. व पु होले सरAugust 30, 2022 1:13 pm

    नमस्कार, अगदी आपण अनुभवलेल्या हरतालीके साठी लागणा-या फुलपत्री गोळा करण्या पासून गुरुजींना सांगणे,इतरांना निरोप देणे,70,80 स्रीयांची बसण्याची व्यवस्था करणे ,एखादीला नसलेली वस्तू देणे,असे सर्व अनुभव आम्ही ४-५ दिवसांपासून घेत आहोत.कारण आमचं घर याचं मुख्य केंद्र आहे.धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच!! हा अनुभव घ्यायला नक्की आवडेल, बघू कधी योग येतो ते!!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  31. Dr R S MorwanchikarAugust 30, 2022 5:00 pm

    For a couple of minutes l felt that I was performing the so called Pooja!! Wonders of the words ✨ 👌 👣

    ReplyDelete
    Replies
    1. आदर पूर्ण नमस्कार सर 🙏 🙇🏻‍♀️

      Delete
  32. अगदी मस्त. हुबेहूब पूजा डोळ्यासमोर उभी राहते.सारेच फुले प्र चि एक नंबर...माला गणपती मंदिर आवडले.पूजा सजावटही वाहच.🙏👌😍😘

    ReplyDelete
    Replies
    1. हो, ते मंदिर माझे सुद्धा खूप आवडते! फक्त मला शिवलिंग असलेले मंदिर आवडीचे होते!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  33. अनिता पाठकSeptember 10, 2022 6:54 pm

    खूप छान लिहिलंय..लहानपणीची आठवण झाली...आम्ही पण उपास ..पूजा करायचो..भाषा पण खूप गोड असते.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  34. भारती फेगडेSeptember 18, 2023 9:24 am

    खुपच छान!! जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.धत्तु-याचे फुल व फळही लागे.खुप महत्त्व असेत्याचे.काकडावात राहिल्या की ताई! आम्ही संकाळ्यां(अंबाडीच्या वाळलेल्या काड्या )चे छोटे तुकडे करून त्याच्या एका टोकाला कापूस गुंडाळून तिला फुलवातीसारखे टोक काढुन करायचो. आमच्या कडे त्याही आवश्यक असत.त्यासाठी ज्यांच्या कडे अंबाडीची झाडे असत तिथुन मागुन आणावी लागत. असो सर्व करुन झाले. आता उपलब्ध असेल त्यात पुजा. हो ना!!

    ReplyDelete
  35. अनिता पाठकSeptember 18, 2023 9:25 am

    👌👌🙏
    खूप सुंदर लिहिलंय...आमच्या लहानपणीची आठवण झाली.
    यात वर्णन केलं आहे ते गाव कोणतं गणपती मंदिराचं?

    ReplyDelete
  36. उषा पाटीलSeptember 18, 2023 9:26 am

    सुंदर मांडणी वा वा मस्त

    ReplyDelete
  37. योगेंद्र आरेकरSeptember 18, 2023 9:31 am

    खूप छान लेख.

    ReplyDelete
  38. वैजयंती मुजूमदारSeptember 18, 2023 3:27 pm

    अप्रतीम शाब्दिक चित्रण हरतालिका पुजनाचे. माझ्या त्या वयातील आई, मावशी करत असलेल्या पूजेची आठवण करून दिली.

    ReplyDelete
  39. गुलाबराव पाटीलSeptember 18, 2023 7:05 pm

    खुप छान लेख आहे. त्यात जे काही वर्णन केलेले आहे ते सुंदर आणि प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  40. अप्रतिम लेख
    सगळा सोहळा जशाचा तसा नजरेसमोर ठाकला,खूप खूप धन्यवाद, अभिनंदन.

    ReplyDelete
  41. डॉ सुनील पुरीSeptember 19, 2023 4:26 pm

    एक सिद्ध हस्त कलाकार आपल्या कलाकृतीत आपले सर्व कसब ओतून ती कलाकृती निर्माण करतो तसेच एक सिद्ध हस्त लेखक आपल्या शब्द सामर्थ्य यातून आपले लेखन करत असतो .आपली लेखाची मांडणी अप्रतिम आहे 💐💐💐💐

    ReplyDelete
  42. पंकज देशमुखSeptember 22, 2023 3:12 pm

    आपण हरतालिका पुजा विषयावर छान लिहले आहे वाचतांना लहापणी आजी आई करित असलेली पुजा ती लगबग सर्व चित्र डोळ्यासमोर जसच्या तस अभे राहिले अप्रतिम लिखाण आपण केले आहे👍🏻

    ReplyDelete
  43. संगीता चव्हाणकेSeptember 05, 2024 6:32 pm

    हो नक्कीच ! आनंदी पाऊस या पानावरून मला आणि माझ्या सारख्या कित्येक जणांना निसर्गातील प्रत्येक क्षणांचा सहवास अनुभवायला मिळाला. शिवाय बालपण देखील जागे झाले. 👆

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...