🔯🕉️🔯 रांगोळी नायिका - ३ 🔯🕉️ (व्यक्ती विशेष) भावाचे रंग रेखुनी, दारात काढू सात्विक रांगोळी I लक्ष्मी देवीची कृपा व्हावी, हीच मंगल कामना निराळी II बाप्पा मोरया आधीच्या भागात म्हटल्या प्रमाणे भूअलंकरण म्हणजेच रांगोळी हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि मनोवेधक लक्षण आहे. एक खास, विशेष अशी भारतीय कला आहे. या कलेच असंख्य उल्लेख, अनेक प्राचीन भारतीय साहित्यात आलेले आहेत. वात्सायन(३-४ शतकात रचले गेले आहे) ह्या ग्रंथात ६४ कलांची यादी दिलेली आहे, या कलांच्या यादीत भूअलंकरण म्हणजेच रांगोळी या कलेचा समावेश केलेला आहे. पहिली रांगोळी, याबद्दल एक लोककथा सांगितली जाते, ब्रह्मदेवाने एकदा आंब्याच्या झाडाचा रस काढून, जमिनीवर एका सुंदर स्त्रीची प्रतिमा काढली. ही सुंदर स्त्री म्हणजे उर्वशी. हीच प्रतिमा पहिली रांगोळी किंवा भूअलंकरण मानले जाते. रामायणात सीता स्वयंवर प्रसंगी रांगोळ्या काढल्याचे उल्लेख ...