Skip to main content

श्री क्षेत्र पद्मालय (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)

                                                                       श्री क्षेत्र पद्मालय 

                                                             (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

                                              वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
              
                जळगांव पासुन साधारण बत्तीस किमी आणि एरंडोल पासुन साधारण दहा किमी अंतरावर असलेले हे ठिकाण, पद्मालय! याच्या नावातच याचा सगळा अर्थ आणि त्या ठिकाणाशी असलेला संबंध कळतो. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर. येथे एक तळं आहे आणि या तळ्यात सप्तरंगी कमळं आहेत. सप्तरंगी म्हणजे सात वेगवेगळ्या रंगाची. 
                हे ठिकाण जवळ जवळ पाच हजार वर्ष जुने आहे. या तळ्याकाठी एक खास मंदीर आहे गणपतीचे. गणपतीच्या अडीच पीठांपैकी अर्धे पीठ आहे. हे मंदीर पेशवाई - उत्तर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराला लागुन मोठा सभा मंडप आहे. मंडपात शिरताच एक पूर्णांक दोन मी. उंचीचा भव्य दगडी उंदीर दिसतो. हे मंदिर खुप खास आणि अनोखे तसेच जगातील एकमेव असे मंदीर आहे. या मंदीरात एकाच गर्भगृहात एक उजव्या सोंडेचा आणि एक डाव्या सोंडेचा गणपती आहे, आमोद आणि प्रमोद! हे दोनही गणपती स्वयंभु आहे. अतिशय जागृत देवस्थान आहे. या मंदिरासमोर एक भव्य घंटा(वजन ४. ५ क्विंटल)  असुन मंदीराच्या प्रवेशद्वारापाशी एक मोठे जातं आहे. या घंटेचा आवाज पंधरा ते सोळा किमी परिसरात ऐकू येतो.  हे मंदीर घनदाट जंगलात असल्याने पावसाळ्यात सगळा परिसर छान हिरवागार झालेला असतो. त्यामुळे भाविकांना दर्शनासह पर्यटनाचा देखील आनंद लुटता येतो. 
                महाभारतातील बकासुर वधाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. पांडव अज्ञातवासात असतांना याच तळ्यात अंघोळीसाठी येत अशी आख्यायिका आहे. पांडव एकचक्री नगरीत राहत, ते म्हणजे आजचे एरंडोल. येथून दोन किमी अंतरावर भीम आणि बकासुराचा युद्ध झाले आहे. या युद्धाचे आधी भीम गाडं भरून अन्न घेऊन आलेला असतो, बकासुरासाठी. तसेच या युद्धात बकासुराचे रक्त सुद्धा सांडले जाते. आम्हाला लहानपणी पद्मालयाची गोष्ट सांगतांना सांगत, अजुनही तिथे भाताची शितं आणि रक्ताचे डाग आहेत खडकावर. आम्हाला फारच कुतूहल वाटे त्याबद्दल. तिथला खडक खरतर बेसॉल्ट या प्रकारचा आहे. पण खरचंच तिथे जाऊन पाहिले तर आजही त्या खडकात बासमती भाताच्या लांबसडक शितांसारखे कण आहे आणि ठीक ठिकाणी लाल रंगाचे डाग सुद्धा आहेत. निसर्गाची ही आगळीच किमया इथे आपल्याला बघायला मिळते आणि त्याला जोडून सांगितलेली बकासुर वधाची आख्यायिका अगदी खरी वाटते. 
                हे युद्ध झाल्यावर भीमाला प्रचंड तहान लागली. मग त्याने आपल्या हाताच्या कोपराने प्रहार करून एक कुंड तयार केले आणि पाणी काढले. हे पाणी पिऊन त्याने आपली तहान भागविली. हे कुंड अजुनही आहे तिथे आणि पाणी सुद्धा आहे त्यात. 
                कार्तिकी पौर्णिमेला इथे एक यात्रा भरते. माझ्या अगदी लहानपणापासुन माहीती असलेले आणि खुप आवडते पर्यटन स्थळ! आज त्याबद्दल लिहायची छान संधी मिळाली. इंट्याक सोलापुरचे मनःपुर्वक शतशः आभार!! 
                शेवट तर गोडच हवा. इथे मिळणारे पेढे प्रसिद्ध आहेत. नक्की भेट द्या आणि पेढ्यांचा स्वाद घ्यायला विसरू नका!!!
।।गणपती बाप्पा मोरया।।

©आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या)
२४नोव्हेंबर २०२०


कळस 



मुख्य गाभारा 
एकाच पीठावर डाव्या आणि उजव्या 
सोंडेचा गणपती




मंडपातील उंदीरमामा 




हीच ती पितळी घंटा 





तळं आणि त्यातील सप्तरंगी कमळं 



हेच ते भलं मोठ्ठ जातं 




भीमाचा पाय 



भाताची शितं 


शिवालय 
















Comments

  1. सुंदर आणि मुद्देसूद लिखाण ...
    शाळेत असताना पद्मालय येथे नेहमी सहल जायच्या.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!

      Delete
  2. Wa sunder mahiti aahe Padmalya chi . Mahabharata chi ktha tyala jod aahe v mandir pan chan
    Pan mi ajun pahile nahi pudhchya veli nakki jaun pahu v pedhe pan khau ��

    ReplyDelete
    Replies
    1. अरे नक्की जा, सगळेच छान आहे अणि बघण्यासारखे सुद्धा, खुप आवडेल तुला!!!

      Delete
  3. स्वाती प्रभुणेFebruary 27, 2021 6:41 pm

    खूपच मस्त माहिती पुढच्या वेळी जळगांव गेले की नक्कीच बघून येऊ गणपती उजव्या व डाव्या सोंडीचा व भीम व पाच पांडव खूप छान माहिती
    एवढा मोठा उंदीर व घटां बापरे

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्की. सगळे छान अणि अद्वितीय आहे. प्रत्येकाने भेट द्यावी असे ठिकाण!!!

      Delete
  4. खूप सुंदर ताई मी लहानपणी एरंडोल येथे रहात असताना नेहमी पाई पद्मालय येथे जात असे येथील घनटेचा आवाज एरंडोलयेथे ऐकू यायचा असे माझी आई मामा सांगत असत पण त्याचे मधील लोलक चोरीला गेला असे सागितले जाते

    ReplyDelete
    Replies
    1. हो अगदी खरी आहे ही माहीती!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  5. Padmalay mandir bhaghitale ahe pan thethil mahabharatashi ashe related chan mahiti kalali pics 👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  6. Pahayachi iccha jali ata vachun sagal. Khup mast

    ReplyDelete
  7. Khupach chchan lihile aahes
    Nandi Hills n Padmalaya che
    Mi regular jato Padmalaya la
    ������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇 🙏

      Delete
  8. Khup chhan zalay lekh. Junta athavanina ujala milala.

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  9. sanjitashrikantMarch 01, 2021 6:04 pm

    महाभारतकालीन आख्यायिका आणी पद्मालय मंदिराची संरचना हे सारे वर्णन अप्रुपच.
    ५००० वर्ष जुन्या मंदिराची माहिती नव्याने लेखातून पाहतां आली.मस्तच....

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  10. Replies
    1. खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!

      Delete
  11. प्रतिभा अमृतेMarch 03, 2021 4:47 pm

    पद्मालय मंदिराबद्दल वाचले. उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा गणपती एकाच ठीकाणी पाहून आश्चर्य वाटले. घंटेचे वर्णन वाचून वाईची घंटा आठवली. मंदिराशी संलग्न महाभारतातील कथा वाचून गम्मत वाटली. आपल्या पुराण कथा पुराव्यानिशी सांगितल्या जातात नाही? भेट द्यायला आवडेल पण मुंबई पासून बरेच लांब आहे. ��

    ReplyDelete
    Replies
    1. बरीच ठिकाण आहेत, चांगला आठवडाभर वेळ काढून या. खूप आवडेल तुम्हाला नक्कीच!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...