Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

माऊली : जीवन घटनाक्रम-२(पैठण पर्व) (featured )

   माऊली : जीवन घटनाक्रम-२  (पैठण पर्व) (featured ) गुरूंच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारून, रुक्मिणीबाई आणि सिद्धोपंतांसोबत आळंदीस प्रस्थान केले. आळंदीस पोहोचल्यावर विठ्ठलपंतांचा परत प्रपंच सुरु झाला. संन्यासाश्रामातून परत गृहस्थाश्रमात प्रवेश केल्याने समाजाने त्यांना वाळीत टाकल्या कारणाने, त्यांना सिद्धबेटावर जाऊन प्रपंच सुरु करावा लागला.(आता इंद्रायणीचे पात्र अतिशय संकुचित झाल्याने, सिद्धबेट हे बेट राहिलेले नसून नदी किनारच झालाय.) अतिशय खडतर असे आयुष्य कंठावे लागले, या कुटुंबियांना. वाळीत जीवन जगावे लागणे, ही  मध्ययुगीन काळातील अत्यंत कठीण अशी शिक्षा होती. नवलाची बाब म्हणजे विठ्ठलपंतांचे वडील आपेगावचे वतनदार, त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या वतनाचे काय झाले? तसेच रुक्मिणीबाईंचे वडील सुद्धा २३ गावांचे वतनदार होते. त्यांनी या उभयतांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी त्यांना तसे करू दिले नाही. माता-पित्याला लेकीचे आणि जावयाचे हाल बघवले नाही, हे दुःख सहन न होऊन त्यांची प्रकृती खालावत गेली, त्यातच आ...

पश्चिमरंग

  पश्चिमरंग चित्र शीर्षक : चांदणी रात्र,   चित्रकार : व्हीन्सेंट व्हॅन गाॅख  वाचन, लेखन, अभ्यास चालू असतो. त्यात सतत काही न काही अडचणी, शंका येत असतात. पण त्या सोडवायला मी गूगल कडे जात नाही. कारण माझ्याकडे गूगल पेक्षा पावरफुलच नाही, तर सर्वस्पर्शी अभ्यासाचा चैतन्यमयी स्त्रोत आहे. अर्थातच हा स्त्रोत म्हणजे माझे गुरु आदरणीय ऋषीतुल्य डॉ रा. श्री. मोरवंचीकर! त्यामुळे त्यांच्याशी अगदी दररोजच संवाद होत असतो.  एक दिवस म्हणाले मी तुझ्यासाठी दोन पुस्तकं राखून ठेवली आहेत, तुझ्यापर्यंत कशी पोहोचवायची? किंवा बघतो, शशिकांत पिंपळापुरे यांच्या मदतीने पाठवायचा प्रयत्न करतो. मग मीच शशिकांत पिंपळापुरे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यांनी ती लगेचच मान्य करून, 'ती' पुस्तकं पाठवली. (मला अभ्यासाठी लागणारी बरीच पुस्तकं शशिकांत पिंपळापुरे पाठवीत असतात.) पुस्तकं घरी पोहोचली पण मी प्रवासात. आठ-दहा दिवसांचा प्रवास, तोही भर उन्हाळ्यातील त्यामुळे भरपूर थकवा वगैरे, तसेच थोडे घराकडेही लक्ष देणे गरजेचे होते. पाकीट उघडून पुस्तकांचे शीर्षक आणि मुख...

माऊली : जीवन घटनाक्रम-१(आळंदी पर्व१) (featured )

  माऊली : जीवन घटनाक्रम-१  (आळंदी पर्व१) (featured )  ज्ञानेश्वर मंदिर! डॉ बाळासाहेब पाटील अर्किओलोजिकल म्युझिअम, पैठण  मूर्तिकार सुनील देवरे! माऊली  जगत् माऊली  साऱ्या विश्वाची माऊली  ज्ञानेश्वर माऊली! ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानकण... ज्ञानेश्वर माऊली म्हणजे देवकण... ज्ञानेश्वर माऊली म्हणजे दैवी ज्ञानकण... ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानातील देवकण... किती बोलावे, किती लिहावे, कसे व्यक्त व्हावे अशी अवस्था होऊन जाते आपल्या साऱ्यांचीच... माऊलींचे आयुष्य, उणेपुरे २१वर्ष, ३महिने, ५दिवसाचे! आज कित्येक शतके उलटली, तथापि माऊली पूर्णार्थाने आकळल्याचे जाणवत नाही. माझा तर अगदी अलीकडचा अभ्यास, सुरुवातच म्हणू या. ती पण माझ्या गुरूंच्या अभ्यासातून/संशोधनातून सुरु झालेली. आपल्या साऱ्यांनाच माऊलींबद्दल नितांत प्रेम, आदर, माया...! तथापि माझ्या लक्षात आले, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना याबाबत सुद्धा जनसामन्यात बराचसा गोंधळ आहे. काही मुद्दे यापूर्वी मलाही काहीसे अस्पष्ट होते. या सगळ्यामुळे माऊलींच्या आयुष्याचा थोडा मुद्देसूद आणि कालक्...

ही श्रींची इच्छा! (चित्रं मालिका)

ही श्रींची इच्छा! (चित्रं मालिका) "हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा!" छत्रपती शिवरायांचे उद्गार. नुकतेच शिव राज्याभिषेक सोहळ्यास साडे तीनशे वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. आज माझा हा छोटासा प्रयत्न, हा खास दिवस अधोरेखित करण्याचा.  शिवाजी महाराजांची आठवण झाली की आठवण होते ती त्यांच्या खास जीरेटोपाची! मोत्याच्या लडी असलेल्या! त्यांच्या प्रत्येक हालचाली बरोबर, त्याच लयीत हिंदकळणाऱ्या! एकदा असेच कधीतरी मनात आले आणि महाराजांचे दोन जिरेटोप मी रेखाटले! सोबतच मावळ्यांची पगडी सुद्धा! दोन्हीही अतिशय खास! स्वाभिमान, शौर्य, धाडस, प्रामाणिकपणा इत्यादींनी ओतप्रोत भरलेले!  जिरेटोप! जिरेटोप आणि मावळा पगडी! तसेच काही काळ पूर्वी "ओम" रेखाटले होते, वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित केले होते. त्यानंतर मनात आले, असेच "श्री" सुद्धा रेखाटावे. पण थोडे वेगळ्या पद्धतीने! भारत हा अतिशय विविधतेने नटलेला देश आहे हे काही नव्याने सांगायला नको. या विविधतेचा एक भाग म्हणजे भिन्न-भिन्न भागात लेखनासाठी वापरत असलेल्या विविध लिपी! मीही सग...

आकाशी झेप घेई... (चित्रं मालिका)

आकाशी झेप घेई...  (चित्रं मालिका)  चू चू!  चिऊ!  चिमणी!  चिऊताई!  मला वाटते आता आता पर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात पक्षी जगतातील सगळ्यात पहिली ओळख म्हणजे चिऊताईची!  चू चू ये इथे इथे बस चारादाणा खा पाणी पी  बाळाच्या डोक्यावरून  भर्रकन उडून जा...  या बडबड गीतातून प्रत्येक बाळाला चिमणी ची ओळख होते.  मलाही तशीच झाली असावी हे नक्की. कारण मी माझ्या कितीतरी लहान भावंडांना आणि भाचे मंडळींना हे बडबड गीत शिकविल्याचे आणि त्या बरोबरच घास भरवल्याचे लख्ख आठवते आहे.  गाण्या-गोष्टीतच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा अवती भवती चिमण्या आणि चिवचिवाट कायमच असे, अगदी आत्ता आत्ता पर्यंत... पण अचानक लक्षात आलं अरे बाकी बरेच पक्षी दिसतात पण चिमणी गायबच झाली आहे...  लहानपणी सतत अवतीभवती असलेली चिमणी अशी एकदम दिसेनाशी होईल असे वाटलेच नाही.  पण लक्षात आले, तेव्हा प्रचंड वाईट वाटले, खुप सैरभैर झाले...  चिमणी संख्या वाढावी म्हणून अनेक जण अनेक प्रयत्न करू लागले, करत आहेत. हे बघून बराच दिलासाही वाटतो.  तथापि चिमणी वाचवा मोहीम, प्रकल्प सुरू झाल्य...