Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

साय आणि पुढील प्रवास - १ (घरातील गमती जमती)

  साय आणि पुढील प्रवास-१ (घरातील गमती जमती)                   साय, लोणी, तुप, बेरी माझे अगदी लहानपणापासुन खुप जिव्हाळ्याचे आणि मनाच्या अगदी जवळचे विषय! सकाळी ताजं दुध आले की अगदी बारीक आचेवर गरम करायचे. बारीक आचेवर गरम करण्याचे दोन फायदे, एक सगळ्यांच्या माहितीचा, तो म्हणजे बारीक आचेवर दुध गरम केले, की ते उतू जात नाही आणि दुसरा फारसा कुणाला माहितीचा नसतो. तो म्हणजे बारीक आचेवर दुध गरम केले म्हणजे त्या दुधावर छान भाकरी सारखी जाड साय येते. मग हे गरम झालेले दुध थंड झाले की शीतकपाटात ठेवायचे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते दुधाचे भांडं शीतकपाटातुन बाहेर काढायचे, त्यावर मस्त जाड साय आलेली असते, ती बघुनच मन हरखुन जाते माझे. मग एक चमचा घेऊन, भांड्याला चिकटलेली सगळी साय खरडून काढुन, साठवणुकीच्या बरणीत काढायची. रोज हळुहळु करत साधारण आठ-दहा दिवसात बरणी सायीने पुर्ण भरून जाते आणि ते पाहुन माझे मनही अगदी तुडुंब भरून जाते!                  ...

भेटवस्तू आणि आनंद (काही अनुभवलेलं.....)

 भेटवस्तू आणि आनंद  (काही अनुभवलेलं.....)                                                                                       आजकाल  तर भेटवस्तू म्हणजे अगदी प्रत्येक छोटे मोठे निमित्त साधून येत असते किंवा दिली जात असते . दररोज हा ना तो दिवस असतो , वाढदिवस असतात , लग्नाचे वाढदिवस असतात , वर्धापन दिवस असतात , निरोप समारंभ असतात , उद्घाटनं असतात , सत्कार समारंभ असतात , या ना त्या कारणाने अभिनंदन करणे असते . बाकी नेहमीचे तर आहेच , डोहाळजेवणं , बारशी , मुंजी , लग्न , स्वागत समारंभ , एकसष्टी , सहस्त्र चंद्रदर्शन , सेवानिवृत्ती , हळदीकुंकू आणि यावं ना त्यावं . हे सगळे कमीच म्हणून हल्ली बहुतांशी सगळ्या कंपन्यांमध्ये कुटुंब दिवस साजरे केले जातात . वर्षभर कौटुंबिक आनंदाचा पुरता बट्ट्याबोळ करून मग एक दिवस कुटुंबाला बोलावून अगदी वर्षभरा...

लाडक्या राजांची जोडी(वारसा स्पर्धा)

  लाडक्या राजांची जोडी. (वारसा स्पर्धा)                  तर ही जोडी कुणी मानवी राजांची नाही , तर ही जोडी आहे दोन झाडांची , फळांचा राजा आंब्याच्या झाडांची म्हणून राजांची  जोडी !                  आमची शेती आमचे मूळ गाव आणि त्याच्या आजूबाजूला विखुरलेली आहे . त्यापैकीच एका शेतात आहे ही जोडी . या फळांचा स्वाद माझ्या आजोबांनीही चाखला आहे म्हणजे उघडच आहे , ही झाड त्याच्या बऱ्याच आधीची असणार . आम्ही मुलं वरचेवर शेतात जात असू , कधी सगळे सोबतच तर कधी एकेकटे , आजी बरोबर किंवा अजून घरातील कोणाही मोठ्या व्यक्ती बरोबर . शेतात उन्हातान्हात भरपूर हुंदडून थकल्यावर छान शांत सावलीची ओढ लागे , तेव्हा ही झाडच आम्हाला त्याच्या विशाल , डेरेदार , थंडगार सावलीत सामावून घेत . असे उन्हातान्हात हुंदडल्यावर या थंडगार सावलीत विसावणे म्हणजे केवळ स्वर्गीय अनुभव , शब्दात वर्णनाच्या पलीकडला !               हे...

पदार्थ - काटेरी हलवा (वारसा स्पर्धा)

पदार्थ - काटेरी हलवा  (वारसा स्पर्धा)                         आपले सगळेच पारंपरिक पदार्थ खूप कष्टाचे आणि बऱ्याच क्रिये-प्रक्रियेतून तयार होणारे असतात . याच कारणाने आजकाल काहीतरी सोप्पा मार्ग शोधून पदार्थ केले जातात . पण मग त्या पदार्थांतील आरोग्य मूल्य कमी होतात किंवा नष्टच होऊन जातात . पारंपरिक पदार्थ शरीराला कुठलीही इजा पोहचवत नाहीतच पण उलट पक्षी ते जर वेळोवेळी त्या त्या मौसमात केले आणि खाल्ले तर  औषधपाण्याची पण गरज पडत नाही . कारण त्या सगळ्यातच तितके औषधी गुण असतात . आणि चवीचा तर प्रश्नच नाही , एकदम अप्रतिमच !                          हे झाले शारीरिक आरोग्य . पण हे मानसिक रित्या सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवतात आणि जास्त बळकट करतात . कारण तो तो पदार्थ करायला वेगवेगळ्या प्रकारची चिकाटी , संयम , स्वच्छता , एकाग्रता गरजेची असते . ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मानसिकरीत्या निरोगी राहण्यास गरजेच्या आहेत , ज्या आजकाल...

वस्तु - तुपाच्या वाढया (वारसा स्पर्धा)

वस्तु - तुपाच्या वाढया  (वारसा स्पर्धा)                                                 मानव अगदी सुरवातीपासूनच समुदायांनी, टोळ्याटोळ्यांनी राहत असे. नंतर एकत्र कुटुंब पद्धती . आता मात्र विभक्त कुटुंब पद्धती, त्यातही प्रत्येक वस्तू प्रत्येकाची वैयक्तिक. त्यामुळे घरातीलच सदस्यांचा एकमेकांशी संबंध फारच कमी, नगण्य. शिवाय आर्थिक सुबत्ता, नको वाटावी इतकी जास्त. त्यामुळे एकमेकांची गरजच नसल्यात जमा, रोजच्या दैनंदिन जीवनात आणि सण-समारंभात सुद्धा.                                                 पूर्वी तसे नव्हते. हे पूर्वी म्हणजे फार पूर्वीही नाही, अगदी दोन पिढ्या आधी. कुटुंब तर एकत्र होतीच आणि आजच्या इतकी आर्थिक सुबत्ताही नव्हती. त्यामुळे सगळेच सगळ्यांवर कुठल्या नी कुठल्या कारणाने अवलंबून असत. त्यामुळे सगळेच एकमेकांना धरून र...

वारसा स्पर्धेच्या निमित्ताने (वारसा स्पर्धा)

 वारसा स्पर्धेच्या निमित्ताने                                     या वर्षातील खुप जास्त आणि  वारंवार वापरले जाणारे शब्द म्हणजे 'कोव्हीड-१९' , 'करोना' , 'टाळेबंदी' . आणि यामुळे घरादारातच नाही तर संपुर्ण जगभरातच एक भयानक नकारात्मकता पसरली आहे . अगदी प्रत्येकाची दैनंदिनी पार बदलुन गेलीये . पण या सगळ्या वाईट परिस्थितीत आणि नकारात्मकते मध्ये सुद्धा खुप सकारात्मक गोष्टी घडत आहेत . या सगळ्या गोष्टीबद्दल नंतर सविस्तर लिहिनच . आत्ता फक्त या एका सकारात्मक गोष्टीबद्दल .                                     ती म्हणजे वारसा स्पर्धा ! इंटॅक संस्थेचे भारतभर वेगवेगळे विभाग आहेत . हे सगळे विभाग सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असतात . या कठीण काळात सुद्धा अनेक कार्यक्रम राबविणे सुरूच आहे , या संस्थेचे . अगदी भरभरून माहिती , ज्ञान  मिळते आहे ....